शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

थकबाकीदारांची महावितरणकडे पाठ

By admin | Updated: November 18, 2016 02:50 IST

थकबाकीदारांना वीजबिल भरण्याची संधी देण्याच्या हेतूने महावितरणने अभय योजना राबवली.

अंबरनाथ : थकबाकीदारांना वीजबिल भरण्याची संधी देण्याच्या हेतूने महावितरणने अभय योजना राबवली. नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा पालिकेच्या मालमत्ताकराप्रमाणे महावितरणला या थकबाकीच्या माध्यमातून होईल, अशी आशा होती. मात्र, या योजनेकडे ग्राहकांनी चक्क पाठ फिरवली. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये सूट देऊनही फक्त २० लाखांचाच भरणा झाला आहे.नागरीकरणात महावितरणचे ग्राहक वाढले, मात्र त्याच वेळी वीजबिल थकवणाऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे अशा थकबाकीदार वीजग्राहकांना थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने अभय योजना आणली. यात ३० नोव्हेंबरपर्यंत थकीत वीजबिलाच्या मुद्दलावर पाच टक्के सूट दिली आहे. पुढील महिन्यापासून ही सूट रद्द केली जाणार आहे. त्यानंतर, जानेवारीपासून काही प्रमाणात दंड स्वीकारला जाईल. अंबरनाथ शहरात जवळपास सात हजार थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यात ११३ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यांची एकत्रितरीत्या थकबाकी ५ कोटी ३८ लाखांच्या घरात आहे. बदलापूरमध्ये ही थकबाकी ५ कोटींच्या वर आहे. त्यामुळे या वसुलीसाठी महावितरणने विविध प्रचारसाधनांद्वारे या अभय योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली. नोटाबदलाच्या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींनी मालमत्ताकर जमा झाला. त्याच धर्तीवर महावितरणलाही थकबाकी जमा होण्याची आशा होती. मात्र, अंबरनाथमध्ये अवघी ५ लाख थकबाकी जमा झाली आहे. बदलापूरमध्ये १५ लाखांची थकबाकी वसूल झाली. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर चालू महिन्याचे बिल भरण्यास नागरिकांनी गर्दी केली. मात्र, थकबाकीदारांनी सूट असूनही या योजनेला प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही.डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने सूट कमी केली जाणार असून एप्रिलनंतर पुन्हा व्याज आणि विलंब आकार लावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)