शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

३० वर्षांनंतर पुन्हा शिकल्या; ५०व्या वर्षी ‘एमए’ झाल्या, तेजस्विनी महाडिक यांचे यश

By नामदेव मोरे | Updated: May 23, 2024 18:38 IST

तीन दशकांच्या खंडानंतर पुन्हा शिक्षणास सुरुवात

नवी मुंबई : शिक्षणाला वयाची अट नसते हे सिवूडमधील ५० वर्षांच्या तेजस्विनी महाडिक यांनी स्वकृतीतून दाखवून दिले आहे. ३० वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा शिक्षण सुरू करून त्यांनी मराठी विषयात एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिवूड येथे राहणाऱ्या तेजस्विनी महाडिक यांनी १९९४ मध्ये बी.कॉमची पदवी मिळविली. पुढे कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण थांबले. कॉमर्समध्ये पदवी मिळविली असली तरी त्यांना मराठी साहित्याची आवड होती. पती रवींद्र महाडिक यांच्यासोबत सिवूड रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत होत्या. मराठीमध्ये पुढील शिक्षण घ्यावे, अशी ओढ मनात होती. 

परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वर्षा भोसले यांच्याशी चर्चा करताना मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. करणे शक्य असल्याचे समजले. यानंतर मुंबईतील के.जी. सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकताच एम.ए.चा निकाल लागला असून, तेजस्विनी या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. ३० वर्षांच्या ब्रेकनंतर मिळालेल्या पदवीविषयी कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. शिवाय सिवूडमधील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिक्षणास वयाची अट नसते. मनात इच्छा असेल तर खंडित झालेले शिक्षण कधीही पूर्ण करता येते हे त्यांनी स्वकृतीतून दाखवून दिले असून, यामुळे अनेकांना शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमातून नागरिकांनीही व्यक्त केल्या आहेत. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणामध्ये अनेक वर्षांचा खंड पडला होता. मराठी विषयाची आवड होती. यामुळे त्यामध्येच पुढील शिक्षण घ्यावे असे ठरविले. ३० वर्षांनंतर पदव्युत्तर पदवी मिळविता आली याचा विशेष आनंद आहे. - तेजस्विनी महाडिक, सिवूड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण