शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:14 IST

सर्वसामान्य ग्राहकांची होते आहे आर्थिक कोंडी

कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : महावितरणने टाळेबंदी असतानाही अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठविली आहेत. नोकरी, व्यवसायांवर गदा आली आहे. सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. घरात बसून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. अशा परिस्थितीत महावितरणने अवास्तव वीज देयके पाठवून सर्वसामान्यांच्या समोर नवीन आर्थिक संकट उभे केले आहे. या समस्येकडे नवी मुंबईतील नेते दुर्लक्ष करत आहेत.

कोरोनामुळे मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. नोकरीधंदा ठप्प पडल्याने बहुतांशी लोकांना घरातच राहावे लागत आहेत. पर्याय म्हणून काहींना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. जून महिन्यापासून अनेक शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत. वर्क फ्रॉम होम आणि आॅनलाइन शाळांमुळे विजेच्या वापरात नक्की किती वाढ होणार आहे, याचे गणित सर्वसामान्यांच्या दृष्टीने नगण्य आहे. असे असले, तरी महावितरणसाठी या बाबी सुवर्णसंधीच्या रूपात प्रकटल्या आहेत. कारण लॉकडाऊनच्याच काळात महावितरणने वीजदरात वाढ केली. त्यानंतर, पावसाळ्याचे दिवस असतानाही जून-जुलै या दोन महिन्यांच्या वीजबिलात भरमसाट वाढ केली. लॉकडाऊनमुळे काटकसरीची सवय लागलेल्या सर्वसामान्य घटक एसीच काय, साधा पंखाही लावायला धजावणार नाहीत. ही वस्तुस्थिती असताना, या दोन महिन्यांची वीजबिले दुप्पट ते तिप्पट कशी वाढली. त्याबाबत ग्राहकांनी गळा आढून ओरड केली. मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या. सरकार वीजबिल कमी करण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या, परंतु तशी कोणतीही सुखद वार्ता आली नाही. उलट आॅगस्ट महिन्याची देयकेही अवाढव्य पाठविण्यात आली. ऐन उत्सवाच्या काळात भरमसाट बिले आल्याने सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. महावितरणला याचा जाब विचारण्यासाठी नवी मुंबईतील एकही नेता पुढे सरसावताना दिसत नाही. कोणी कायदेशीर लढाई लढण्याची तयारीही दाखविली नाही. महापालिकेच्या आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून केवळ कागदी घोडे नाचविण्यात ही तथाकथित नेते मंडळी मशगुल आहेत. याला कोणत्या मानसिकतेचे द्योतक म्हणावे, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.

ठाणे, मुंबईसह वाढीव वीजबिलाच्या विरोधात आक्रमक आंदोलने सुरू आहेत. अनेक जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वाढीव वीजबिलाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरू असताना, नवी मुंबईतील नेतेमंडळी मात्र महापालिका निवडणुकीची व्यूहरचना करण्यात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहेत. राजकीय पक्षांची आंदोलने व निदर्शने केवळ दिखाऊपणाची ठरली आहेत. कारण महावितरण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. वाढीव बिलाची तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना अगदी क्लिष्ट पद्धतीने बिल कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचे चोख काम महावितरणचे संबंधित अधिकारी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोणाकडे दाद मागायची, असा सवाल शहरातील विद्युत ग्राहकांना सतावत आहे.अनियमित वीज, तरीही अवास्तव देयकेशहराच्या अनेक भागांत आजही नियमित वीजपुरवठा होत नाही. विशेषत: घणसोली परिसरात तर विजेचा खेळखंडोबा येथील रहिवाशांच्या पाचवीलाच पूजला आहे. त्या पाठोपाठ ऐरोली, गोठीवली, तसेच कोपरखैरणे परिसरातील रहिवाशांनी सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी महावितरण अवास्तव बिले पाठवून ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज