शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:14 IST

सर्वसामान्य ग्राहकांची होते आहे आर्थिक कोंडी

कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : महावितरणने टाळेबंदी असतानाही अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठविली आहेत. नोकरी, व्यवसायांवर गदा आली आहे. सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. घरात बसून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. अशा परिस्थितीत महावितरणने अवास्तव वीज देयके पाठवून सर्वसामान्यांच्या समोर नवीन आर्थिक संकट उभे केले आहे. या समस्येकडे नवी मुंबईतील नेते दुर्लक्ष करत आहेत.

कोरोनामुळे मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. नोकरीधंदा ठप्प पडल्याने बहुतांशी लोकांना घरातच राहावे लागत आहेत. पर्याय म्हणून काहींना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. जून महिन्यापासून अनेक शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत. वर्क फ्रॉम होम आणि आॅनलाइन शाळांमुळे विजेच्या वापरात नक्की किती वाढ होणार आहे, याचे गणित सर्वसामान्यांच्या दृष्टीने नगण्य आहे. असे असले, तरी महावितरणसाठी या बाबी सुवर्णसंधीच्या रूपात प्रकटल्या आहेत. कारण लॉकडाऊनच्याच काळात महावितरणने वीजदरात वाढ केली. त्यानंतर, पावसाळ्याचे दिवस असतानाही जून-जुलै या दोन महिन्यांच्या वीजबिलात भरमसाट वाढ केली. लॉकडाऊनमुळे काटकसरीची सवय लागलेल्या सर्वसामान्य घटक एसीच काय, साधा पंखाही लावायला धजावणार नाहीत. ही वस्तुस्थिती असताना, या दोन महिन्यांची वीजबिले दुप्पट ते तिप्पट कशी वाढली. त्याबाबत ग्राहकांनी गळा आढून ओरड केली. मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या. सरकार वीजबिल कमी करण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या, परंतु तशी कोणतीही सुखद वार्ता आली नाही. उलट आॅगस्ट महिन्याची देयकेही अवाढव्य पाठविण्यात आली. ऐन उत्सवाच्या काळात भरमसाट बिले आल्याने सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. महावितरणला याचा जाब विचारण्यासाठी नवी मुंबईतील एकही नेता पुढे सरसावताना दिसत नाही. कोणी कायदेशीर लढाई लढण्याची तयारीही दाखविली नाही. महापालिकेच्या आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून केवळ कागदी घोडे नाचविण्यात ही तथाकथित नेते मंडळी मशगुल आहेत. याला कोणत्या मानसिकतेचे द्योतक म्हणावे, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.

ठाणे, मुंबईसह वाढीव वीजबिलाच्या विरोधात आक्रमक आंदोलने सुरू आहेत. अनेक जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वाढीव वीजबिलाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरू असताना, नवी मुंबईतील नेतेमंडळी मात्र महापालिका निवडणुकीची व्यूहरचना करण्यात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहेत. राजकीय पक्षांची आंदोलने व निदर्शने केवळ दिखाऊपणाची ठरली आहेत. कारण महावितरण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. वाढीव बिलाची तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना अगदी क्लिष्ट पद्धतीने बिल कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचे चोख काम महावितरणचे संबंधित अधिकारी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोणाकडे दाद मागायची, असा सवाल शहरातील विद्युत ग्राहकांना सतावत आहे.अनियमित वीज, तरीही अवास्तव देयकेशहराच्या अनेक भागांत आजही नियमित वीजपुरवठा होत नाही. विशेषत: घणसोली परिसरात तर विजेचा खेळखंडोबा येथील रहिवाशांच्या पाचवीलाच पूजला आहे. त्या पाठोपाठ ऐरोली, गोठीवली, तसेच कोपरखैरणे परिसरातील रहिवाशांनी सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी महावितरण अवास्तव बिले पाठवून ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज