शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत टेकडीला भूस्खलनाचा धोका!

By admin | Updated: May 23, 2017 02:11 IST

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती.

कांता हाबळे  लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती. अशा घटनांचा पूर्वानुभव असतानाही संबंधित प्रशासनाकडून सजगता दाखवली जात नसल्याचे कर्जतमध्ये दिसून येत आहे. कर्जत परिसरातील टेकडीचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. टेकडीची धूप होत असल्याने याठिकाणी पावसाळ्यात भूस्खलनाचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांवर सतत टांगती तलवार आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या टेकडीवर ब्रिटिशकालीन वास्तूत तहसील कार्यालय, रजिस्टर कार्यालय आहेत, तर जवळच कारागृह आहे. याचठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे विश्रामगृह असून टेकडीच्या माथ्यावर वेदमाता मंदिर आहे. त्यामुळे भक्तगणांचाही येथे वावर आहे. निसर्गरम्य वातावरण असल्याने सकाळी जॉगिंग व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेकजण याठिकाणी येतात. शहराला पाणीपुरवठा करणारी टाकीही याच टेकडीवर आहे.टेकडीलगत सतत उत्खनन सुरू असते याशिवाय वृक्षतोडही होत असल्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परिणामी टेकडीवरील डांबरी रस्त्याला मधोमध तडे गेले असून वळणावर रस्ताही खचला आहे. टेकडीवरील दरड कोसळून भलेमोठे दगडही रस्त्यावर येऊन पडले आहेत. या रस्त्यावरून शासकीय कामकाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचल्यास मोठा धोका उद्भवू शकतो.टेकडीच्या पायथ्याशी मुद्रे गाव वसले आहे. गावातील काही घरे उतारावर आहेत. ही घरे उभारताना पूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे. यापूर्वी या उतारावर मोठ्या प्रमाणात बांबूची बेटे असल्याने जमिनीची धूप रोखण्यास मदत व्हायची. परंतु गेल्या काही वर्षांत बांबूची बेटे जवळजवळ नष्ट झाली आहे. त्यामुळे टेकडीच्या उतारावरील मातीची धूप सुरू झाली असून अतिवृष्टी झाल्यास भूस्खलन होऊन टेकडीचा काही भाग पायथ्याशी असणाऱ्या घरांवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमुळेही टेकडीवर प्रचंड दाब पडत आहे. तरी संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कर्जत शहरामध्ये पर्यटनस्थळ नसल्याने नागरिकांसाठी टेकडी हेच एक पर्यटनस्थळ आहे. टेकडीवरून दूरवर दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य, दूरवर पसरलेली कृषी संशोधन केंद्राची भातशेती, टेकड्यांमधून आडमोळी वाट काढत जाणारा कर्जत-पनवेल रेल्वेमार्ग, दूरपर्यंत वसलेले कर्जत शहर आणि परिसराचे दर्शन या टेकडीवरून होते. सोसाट्याचा वारा, वनराई यामुळे या टेकडीवर सायंकाळी फेरफटका मारण्यास अनेकजण येतात. पहाटेच्यावेळी जॉगिंगसाठीही या टेकडीला प्राधान्य दिले जाते. या सर्व बाबींचा विचार करून या टेकडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, अशी कर्जतकरांची अपेक्षा आहे.