शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

कर्जत टेकडीला भूस्खलनाचा धोका!

By admin | Updated: May 23, 2017 02:11 IST

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती.

कांता हाबळे  लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती. अशा घटनांचा पूर्वानुभव असतानाही संबंधित प्रशासनाकडून सजगता दाखवली जात नसल्याचे कर्जतमध्ये दिसून येत आहे. कर्जत परिसरातील टेकडीचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. टेकडीची धूप होत असल्याने याठिकाणी पावसाळ्यात भूस्खलनाचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांवर सतत टांगती तलवार आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या टेकडीवर ब्रिटिशकालीन वास्तूत तहसील कार्यालय, रजिस्टर कार्यालय आहेत, तर जवळच कारागृह आहे. याचठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे विश्रामगृह असून टेकडीच्या माथ्यावर वेदमाता मंदिर आहे. त्यामुळे भक्तगणांचाही येथे वावर आहे. निसर्गरम्य वातावरण असल्याने सकाळी जॉगिंग व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेकजण याठिकाणी येतात. शहराला पाणीपुरवठा करणारी टाकीही याच टेकडीवर आहे.टेकडीलगत सतत उत्खनन सुरू असते याशिवाय वृक्षतोडही होत असल्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परिणामी टेकडीवरील डांबरी रस्त्याला मधोमध तडे गेले असून वळणावर रस्ताही खचला आहे. टेकडीवरील दरड कोसळून भलेमोठे दगडही रस्त्यावर येऊन पडले आहेत. या रस्त्यावरून शासकीय कामकाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचल्यास मोठा धोका उद्भवू शकतो.टेकडीच्या पायथ्याशी मुद्रे गाव वसले आहे. गावातील काही घरे उतारावर आहेत. ही घरे उभारताना पूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे. यापूर्वी या उतारावर मोठ्या प्रमाणात बांबूची बेटे असल्याने जमिनीची धूप रोखण्यास मदत व्हायची. परंतु गेल्या काही वर्षांत बांबूची बेटे जवळजवळ नष्ट झाली आहे. त्यामुळे टेकडीच्या उतारावरील मातीची धूप सुरू झाली असून अतिवृष्टी झाल्यास भूस्खलन होऊन टेकडीचा काही भाग पायथ्याशी असणाऱ्या घरांवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमुळेही टेकडीवर प्रचंड दाब पडत आहे. तरी संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कर्जत शहरामध्ये पर्यटनस्थळ नसल्याने नागरिकांसाठी टेकडी हेच एक पर्यटनस्थळ आहे. टेकडीवरून दूरवर दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य, दूरवर पसरलेली कृषी संशोधन केंद्राची भातशेती, टेकड्यांमधून आडमोळी वाट काढत जाणारा कर्जत-पनवेल रेल्वेमार्ग, दूरपर्यंत वसलेले कर्जत शहर आणि परिसराचे दर्शन या टेकडीवरून होते. सोसाट्याचा वारा, वनराई यामुळे या टेकडीवर सायंकाळी फेरफटका मारण्यास अनेकजण येतात. पहाटेच्यावेळी जॉगिंगसाठीही या टेकडीला प्राधान्य दिले जाते. या सर्व बाबींचा विचार करून या टेकडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, अशी कर्जतकरांची अपेक्षा आहे.