शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

रुंदीकरणात भूसंपादनाचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:37 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला.

- वैभव गायकरपनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरु वात झाली. मात्र, अद्याप हे रुंदीकरण पूर्ण झालेले नाही. भूसंपादन प्रक्रियेस होणाऱ्या विलंबामुळे कामात अडथळा येत आहे.रायगड जिल्ह्यात दोन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर तर दुसरा टप्पा इंदापूर ते कशेडी असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २०९ हेक्टर जमिनी शासनाला संपादित करायची होती. त्यापैकी २०७ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली आहे. विशेष म्हणजे, या संपादनाच्या प्रक्रि येत अनेक ठिकाणी मूळ जागेच्या ठिकाणी वेगळीच जागा दाखवण्यात आल्याने अनेक शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या संपादनातून दोन हेक्टर जमीन वगळण्यात आली आहे. जमिनी संपादित केल्याची नोंद शासन दरबारी असताना प्रत्यक्षात जमीन संपादित झालीच नसल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, खासगी वाटाघाटी या शासनाच्या नव्या जीआरनुसार सुमारे २३ शेतकºयांकडून नव्याने ३.२३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या शेतकºयांचे नव्याने खरेदीखतदेखील तयार करण्यात आले आहे. या शेतकºयांना २०१८ प्रमाणे जमिनीचा मोबदला दिला गेल्याने इतर शेतकºयांच्या तुलनेत या शेतकºयांना जास्त मोबदला मिळणार आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला विलंब होत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. ८४ कि.मी.चे हे रुंदीकरण असून नऊ वर्षांनंतरही काम अंतिम टप्प्यात आलेले नाही.संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आलेला आहे. विशेषत: या संदर्भात प्रतिक्रि या जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हेमंत फेगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.>भूसंपादन प्रक्रि येमध्ये कोणताही अडथळा नसून संपादित केलेली जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली आहे. २ हेक्टर जमीन संपादनातून वगळण्यात आली आहे. ३.२३ हेक्टर जमीन नव्याने संपादित करण्यात आली आहे. संबंधित शेतकºयांना २0१८ नुसार जमिनीचा मोबदला देण्यात आलेला आहे.- प्रतिमा पुदलवाड,भूसंपादन अधिकारी,पेण>भूसंपादन अधिकाºयांच्या चुकीच्या नोंदीमुळे भूसंपादन प्रक्रि या अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, मालमत्ता बाधित नसतानादेखील अनेकांना मोबदला देण्यात आलेला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.- संतोष ठाकूर,समन्वयक, पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त कृती समिती