शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

रुंदीकरणात भूसंपादनाचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:37 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला.

- वैभव गायकरपनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरु वात झाली. मात्र, अद्याप हे रुंदीकरण पूर्ण झालेले नाही. भूसंपादन प्रक्रियेस होणाऱ्या विलंबामुळे कामात अडथळा येत आहे.रायगड जिल्ह्यात दोन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर तर दुसरा टप्पा इंदापूर ते कशेडी असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २०९ हेक्टर जमिनी शासनाला संपादित करायची होती. त्यापैकी २०७ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली आहे. विशेष म्हणजे, या संपादनाच्या प्रक्रि येत अनेक ठिकाणी मूळ जागेच्या ठिकाणी वेगळीच जागा दाखवण्यात आल्याने अनेक शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या संपादनातून दोन हेक्टर जमीन वगळण्यात आली आहे. जमिनी संपादित केल्याची नोंद शासन दरबारी असताना प्रत्यक्षात जमीन संपादित झालीच नसल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, खासगी वाटाघाटी या शासनाच्या नव्या जीआरनुसार सुमारे २३ शेतकºयांकडून नव्याने ३.२३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या शेतकºयांचे नव्याने खरेदीखतदेखील तयार करण्यात आले आहे. या शेतकºयांना २०१८ प्रमाणे जमिनीचा मोबदला दिला गेल्याने इतर शेतकºयांच्या तुलनेत या शेतकºयांना जास्त मोबदला मिळणार आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला विलंब होत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. ८४ कि.मी.चे हे रुंदीकरण असून नऊ वर्षांनंतरही काम अंतिम टप्प्यात आलेले नाही.संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आलेला आहे. विशेषत: या संदर्भात प्रतिक्रि या जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हेमंत फेगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.>भूसंपादन प्रक्रि येमध्ये कोणताही अडथळा नसून संपादित केलेली जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली आहे. २ हेक्टर जमीन संपादनातून वगळण्यात आली आहे. ३.२३ हेक्टर जमीन नव्याने संपादित करण्यात आली आहे. संबंधित शेतकºयांना २0१८ नुसार जमिनीचा मोबदला देण्यात आलेला आहे.- प्रतिमा पुदलवाड,भूसंपादन अधिकारी,पेण>भूसंपादन अधिकाºयांच्या चुकीच्या नोंदीमुळे भूसंपादन प्रक्रि या अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, मालमत्ता बाधित नसतानादेखील अनेकांना मोबदला देण्यात आलेला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.- संतोष ठाकूर,समन्वयक, पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त कृती समिती