शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कर्जतमधील तलाव होणार गाळमुक्त

By admin | Updated: June 1, 2016 02:47 IST

उन्हाळा सुरू झाला की तालुक्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून तहसील कार्यालयाने प्रत्येक गावात जे पारंपरिक तलाव आहे

कर्जत : उन्हाळा सुरू झाला की तालुक्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून तहसील कार्यालयाने प्रत्येक गावात जे पारंपरिक तलाव आहे, त्या तलावातील गाळ काढून त्या तलावाची खोली, लांबी, रु ंदी वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. उपविभागीय अधिकारी (प्रांत) दत्ता भडकवाड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून या तलावाचा गाळ लोकसहभागातून काढला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी दिली.उन्हाळ्यात वाड्यापाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून कर्जत तहसील कार्यालयाने ज्या गावात पारंपरिक तलाव आहेत त्या तलावाचा गाळ काढणे, त्याची खोली, लांबी, रु ंदी वाढविण्याचे कामे हाती घेतली आहेत. यामुळे या पावसाळ्यात या तलावात मुबलक पाणीसाठा होईल. त्यामुळे उन्हाळ्यात गुराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल आणि गाववाले सुध्दा पाण्याचा वापर करू शकतील. कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीत आंबिवली गाव आहे. या गावात सुमारे ८० घरांची वस्ती आहे. या गावात दोन एकरांमध्ये पारंपरिक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. त्यामुळे तलावाची खोली, लांबी, रु ंदी कमी झाली होती. आतमध्ये बेशरम झाडांनी अतिक्रमण केले होते. या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचा निर्णय तहसीलदार रविंद्र बावीस्कर यांनी घेतला. आणि याच गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक सावंत यांना यासाठी प्रयत्न के ले. तलावातील गाळ काढण्यासाठी तीन जेसीबी यंत्रे लावली आणि काढलेला गाळ उचलून हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी तीन डंपर लावले. या तलावातून सुमारे एक हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.गाळ काढल्याने तलावाची खोली, लांबी, रु ंदी वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तलावामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने त्यांना शेतीसाठी फायदा होणार आहे. हे काम लोकांच्या सहभागातून करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा पैसा वाचला आहे आणि हे काम गावकीचे असल्याने ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य केले. तलावातील गाळ काढताना अशोक सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश खेडेकर, ग्रामसेवक ए. एल. भानवसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पारधी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम चालू असताना प्रांत दत्ता भडकवाड, तहसीलदार रवींद्र बाविस्कर, अव्वल कारकून किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)