शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये प्रवासाची संधी न मिळाल्याने रेल्वे अपघात घटले; नवी मुंबईत ४६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 01:10 IST

२०२० मध्ये निम्म्यावर आले प्रमाण

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वेअपघातामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये घडलेल्या अपघातांच्या तुलनेत २०२० मध्ये निम्म्याहून कमी अपघाती मृत्यू झाले आहेत. गतवर्षाचा बहुतांश कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने अपघातांमध्ये मोठी घट झाली आहे.

२०१९ मध्ये नवी मुंबईत एकूण १६९ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. परंतु गतवर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू रेल्वे अपघातात झाले असून ४ मृत्यू नैसर्गिक आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत मानखुर्द ते बेलापूर व वाशी ते ऐरोली दरम्यान हे अपघात घडले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे वाशी खाडीपूललगत अथवा मानखुर्द, जुईनगर व ज्या स्थानकांमध्ये रुळावरून प्रवेशाचा मार्ग मोकळा आहे अशा ठिकाणी घडले आहेत.

स्थानकात प्रवेशासाठी रुळावरून चालत जाण्याचा शॉर्टकट जीवावर बेतत आहे. मात्र २०२० मध्ये मार्चनंतर रेल्वे रुळावरच न धावल्याने असे अपघात टळले आहेत. तर रेल्वे सुरू झाल्यानंतरदेखील केवळ ठरावीक वर्गाच्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असल्याने रेल्वेतली चेंगराचेंगरी व दरवाजातील प्रवास यालाही आळा बसला आहे. अप्रत्यक्षरीत्या याचा परिणाम प्राणांतिक अपघात टळण्यावर झाला आहे.

दरवर्षी दीडशेहून अधिक लोकांचा जातो प्राणनवी मुंबईत रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रतिवर्षी दीडशेहून अधिक व्यक्तींचे प्राण जातात. तर अनेक जण जखमी होतात. धावत रेल्वेत प्रवेश करणे, धावत्या रेल्वेतून उतरणे अशी काही त्यामागे कारणे आहेत. मात्र २०२० मध्ये रेल्वे प्रवासाची संधीच न मिळाल्याने अपघातांचे प्रमाण निम्म्याहून कमी आले आहे

गेल्या वर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू अपघाती असून ४ नैसर्गिक आहेत. तर २२ प्रवासी अपघातामध्ये जखमी झाले आहेत.- विष्णू केसरकर, वरिष्ठ निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या