शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

लॉकडाऊनमध्ये प्रवासाची संधी न मिळाल्याने रेल्वे अपघात घटले; नवी मुंबईत ४६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 01:10 IST

२०२० मध्ये निम्म्यावर आले प्रमाण

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वेअपघातामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये घडलेल्या अपघातांच्या तुलनेत २०२० मध्ये निम्म्याहून कमी अपघाती मृत्यू झाले आहेत. गतवर्षाचा बहुतांश कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने अपघातांमध्ये मोठी घट झाली आहे.

२०१९ मध्ये नवी मुंबईत एकूण १६९ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. परंतु गतवर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू रेल्वे अपघातात झाले असून ४ मृत्यू नैसर्गिक आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत मानखुर्द ते बेलापूर व वाशी ते ऐरोली दरम्यान हे अपघात घडले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे वाशी खाडीपूललगत अथवा मानखुर्द, जुईनगर व ज्या स्थानकांमध्ये रुळावरून प्रवेशाचा मार्ग मोकळा आहे अशा ठिकाणी घडले आहेत.

स्थानकात प्रवेशासाठी रुळावरून चालत जाण्याचा शॉर्टकट जीवावर बेतत आहे. मात्र २०२० मध्ये मार्चनंतर रेल्वे रुळावरच न धावल्याने असे अपघात टळले आहेत. तर रेल्वे सुरू झाल्यानंतरदेखील केवळ ठरावीक वर्गाच्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असल्याने रेल्वेतली चेंगराचेंगरी व दरवाजातील प्रवास यालाही आळा बसला आहे. अप्रत्यक्षरीत्या याचा परिणाम प्राणांतिक अपघात टळण्यावर झाला आहे.

दरवर्षी दीडशेहून अधिक लोकांचा जातो प्राणनवी मुंबईत रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रतिवर्षी दीडशेहून अधिक व्यक्तींचे प्राण जातात. तर अनेक जण जखमी होतात. धावत रेल्वेत प्रवेश करणे, धावत्या रेल्वेतून उतरणे अशी काही त्यामागे कारणे आहेत. मात्र २०२० मध्ये रेल्वे प्रवासाची संधीच न मिळाल्याने अपघातांचे प्रमाण निम्म्याहून कमी आले आहे

गेल्या वर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू अपघाती असून ४ नैसर्गिक आहेत. तर २२ प्रवासी अपघातामध्ये जखमी झाले आहेत.- विष्णू केसरकर, वरिष्ठ निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या