शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लॉकडाऊनमध्ये प्रवासाची संधी न मिळाल्याने रेल्वे अपघात घटले; नवी मुंबईत ४६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 01:10 IST

२०२० मध्ये निम्म्यावर आले प्रमाण

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वेअपघातामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये घडलेल्या अपघातांच्या तुलनेत २०२० मध्ये निम्म्याहून कमी अपघाती मृत्यू झाले आहेत. गतवर्षाचा बहुतांश कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने अपघातांमध्ये मोठी घट झाली आहे.

२०१९ मध्ये नवी मुंबईत एकूण १६९ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. परंतु गतवर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू रेल्वे अपघातात झाले असून ४ मृत्यू नैसर्गिक आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत मानखुर्द ते बेलापूर व वाशी ते ऐरोली दरम्यान हे अपघात घडले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे वाशी खाडीपूललगत अथवा मानखुर्द, जुईनगर व ज्या स्थानकांमध्ये रुळावरून प्रवेशाचा मार्ग मोकळा आहे अशा ठिकाणी घडले आहेत.

स्थानकात प्रवेशासाठी रुळावरून चालत जाण्याचा शॉर्टकट जीवावर बेतत आहे. मात्र २०२० मध्ये मार्चनंतर रेल्वे रुळावरच न धावल्याने असे अपघात टळले आहेत. तर रेल्वे सुरू झाल्यानंतरदेखील केवळ ठरावीक वर्गाच्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असल्याने रेल्वेतली चेंगराचेंगरी व दरवाजातील प्रवास यालाही आळा बसला आहे. अप्रत्यक्षरीत्या याचा परिणाम प्राणांतिक अपघात टळण्यावर झाला आहे.

दरवर्षी दीडशेहून अधिक लोकांचा जातो प्राणनवी मुंबईत रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रतिवर्षी दीडशेहून अधिक व्यक्तींचे प्राण जातात. तर अनेक जण जखमी होतात. धावत रेल्वेत प्रवेश करणे, धावत्या रेल्वेतून उतरणे अशी काही त्यामागे कारणे आहेत. मात्र २०२० मध्ये रेल्वे प्रवासाची संधीच न मिळाल्याने अपघातांचे प्रमाण निम्म्याहून कमी आले आहे

गेल्या वर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू अपघाती असून ४ नैसर्गिक आहेत. तर २२ प्रवासी अपघातामध्ये जखमी झाले आहेत.- विष्णू केसरकर, वरिष्ठ निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या