शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

चाचणी सेंटरअभावी फरफट वाढली; प्रवासात संसर्ग पसरण्याचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 00:34 IST

गतवर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे.

नवी मुंबई : शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. परंतु विभागनिहाय पुरेसे चाचणी सेंटर नसल्याने रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागत आहे. याचाच फायदा घेऊन खासगी लॅब व रुग्णालयांकडून भरमसाठ शुल्क आकारून चाचण्या केल्या जात आहेत.गतवर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. सध्या प्रतिदिन एक हजारच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लक्षणांशी मिळते-जुळते त्रास असलेल्या व्यक्ती पालिकेच्या चाचणी केंद्रांकडे धाव घेत आहेत. परंतु सर्वच ठिकाणी दुपारपर्यंतच चाचणी केंद्र चालवले जात आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला संध्याकाळी अथवा रात्री त्रास होऊ लागल्यास चाचणी करायची कुठे? असा प्रश्न उद्भवत आहे. याचाच फायदा घेऊन खासगी लॅब व रुग्णालयांकडून जादा शुल्क आकारून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. हा खर्च एकाच कुटुंबात जास्त व्यक्ती असलेल्या मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. यामुळे त्यांना पालिकेच्या चाचणी केंद्राच्या शोधात एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागत आहे. यादरम्यान त्यांच्याकडून रिक्षा अथवा बसने प्रवास झाल्यास या प्रवासात इतरांनाही संसर्ग पसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात पूर्णवेळ चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही विभागनिहाय पूर्णवेळ चाचणी केंद्र सुरू न करता कोरोनाचा संसर्ग वाढीला प्रशासनच हातभार लावत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या