शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बालपणाचे अपहरण; तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:20 IST

५०० अल्पवयीन मुलींचा समावेश

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पनवेल, नवी मुंबईसह उरण परिसरामध्ये अल्पवयीन मुले घर सोडून जाण्याचे व त्यांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये ५०० मुलींचा समावेश आहे. मुलींच्या अपहरणातील ४५८ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले असून बहुतांश घटना प्रेमप्रकरण व कौटुंबिक वादातून घडत असल्याचे उघडकीस आले आहे.मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता होण्यामुळे पालकांपुढील चिंता वाढत आहे. मागील काही वर्षांत अज्ञातांकडून घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. त्यानुसार मागील तीन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून एकूण ७२६ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ५०० गुन्हे मुलींच्या अपहरणाचे असून ४५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलींचा राज्यासह देशाच्या विविध भागातून शोध घेवून त्यांना पळवून नेणाऱ्यांना कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सर्वाधिक मुली प्रेमप्रकरणातून लग्नाच्या आमिषाला भुलून मुलांसोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. मुलींप्रमाणेच शहरातून तीन वर्षात २२६ मुलांच्या अपहरणाची नोंद पोलिसांकडे असून, त्यापैकी २१६ मुलांचा पोलिसांनी शोध घेवून पालकांच्या ताब्यात दिले आहे.अल्पवयीन मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांकडून कसून प्रयत्न होतात. परंतु चार महिन्यानंतरही त्यांचा शोध न लागल्यास हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासासाठी वर्ग केला जातो, अथवा संयुक्तरीत्या तपास केला जातो. त्यानुसार या पथकाने मागील तीन वर्षात स्वतंत्रपणे ६५ मुला-मुलींचा शोध घेतला आहे. यामुळे शहरातून जरी अल्पवयीन मुले-मुलींच्या अपहरणाचे प्रकार घडत असले, तरीही पोलिसांकडून त्याचा उलगडा करण्याचे कौशल्य दाखवले आहे. मात्र अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामागे सर्वाधिक प्रेमप्रकरणाचे कारण समोर येत असल्याचे गांभीर्य देखील पोलिसांकडून व्यक्त होत आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले जात आहे. अशा काही घटनांमध्ये परराज्यातील तरुणांची टोळी असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून परराज्यात पळवून नेण्यामागे टोळी सक्रिय असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.संवाद हरवतोयधावपळीच्या जीवनामध्ये पालक व मुलांमधील संवाद हरवू लागला आहे. पौगांडावस्थेमध्ये आलेल्या मुलांना पुरेसा वेळ पालकांकडून दिला जात नाही. यामुळे संवाद तुटतो व पुढे प्रेमप्रकरण किंवा मुलांच्या इतर तक्रारींमुळे घरांमध्ये भांडणे सुरू होत आहेत. यामुळे मुले घर सोडण्याचा निर्णय घेत असून पालकांनीही घरातील संवाद वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.सामाजिक जबाबदारीघर सोडून जाणाºया मुलांची संख्या वाढत आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेवून येणाºया मुलांना समजावण्याचे कामही पोलीस करत आहेत.समुपदेशन केंद्रांची गरजअल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ९० टक्के मुलींना लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्या घर सोडून गेल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. घरातील भांडणांमुळेही लहान मुले, मुली घर सोडून जात आहेत. पालकांनी समजावून सांगितलेले मुले ऐकत नाहीत. घर सोडण्यास तयार होणाºया या मुलांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. योग्य समुपदेशन केल्यास यामधील बहुतांश घटना कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा