शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बालपणाचे अपहरण; तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:20 IST

५०० अल्पवयीन मुलींचा समावेश

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पनवेल, नवी मुंबईसह उरण परिसरामध्ये अल्पवयीन मुले घर सोडून जाण्याचे व त्यांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये ५०० मुलींचा समावेश आहे. मुलींच्या अपहरणातील ४५८ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले असून बहुतांश घटना प्रेमप्रकरण व कौटुंबिक वादातून घडत असल्याचे उघडकीस आले आहे.मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता होण्यामुळे पालकांपुढील चिंता वाढत आहे. मागील काही वर्षांत अज्ञातांकडून घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. त्यानुसार मागील तीन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून एकूण ७२६ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ५०० गुन्हे मुलींच्या अपहरणाचे असून ४५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलींचा राज्यासह देशाच्या विविध भागातून शोध घेवून त्यांना पळवून नेणाऱ्यांना कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सर्वाधिक मुली प्रेमप्रकरणातून लग्नाच्या आमिषाला भुलून मुलांसोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. मुलींप्रमाणेच शहरातून तीन वर्षात २२६ मुलांच्या अपहरणाची नोंद पोलिसांकडे असून, त्यापैकी २१६ मुलांचा पोलिसांनी शोध घेवून पालकांच्या ताब्यात दिले आहे.अल्पवयीन मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांकडून कसून प्रयत्न होतात. परंतु चार महिन्यानंतरही त्यांचा शोध न लागल्यास हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासासाठी वर्ग केला जातो, अथवा संयुक्तरीत्या तपास केला जातो. त्यानुसार या पथकाने मागील तीन वर्षात स्वतंत्रपणे ६५ मुला-मुलींचा शोध घेतला आहे. यामुळे शहरातून जरी अल्पवयीन मुले-मुलींच्या अपहरणाचे प्रकार घडत असले, तरीही पोलिसांकडून त्याचा उलगडा करण्याचे कौशल्य दाखवले आहे. मात्र अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामागे सर्वाधिक प्रेमप्रकरणाचे कारण समोर येत असल्याचे गांभीर्य देखील पोलिसांकडून व्यक्त होत आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले जात आहे. अशा काही घटनांमध्ये परराज्यातील तरुणांची टोळी असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून परराज्यात पळवून नेण्यामागे टोळी सक्रिय असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.संवाद हरवतोयधावपळीच्या जीवनामध्ये पालक व मुलांमधील संवाद हरवू लागला आहे. पौगांडावस्थेमध्ये आलेल्या मुलांना पुरेसा वेळ पालकांकडून दिला जात नाही. यामुळे संवाद तुटतो व पुढे प्रेमप्रकरण किंवा मुलांच्या इतर तक्रारींमुळे घरांमध्ये भांडणे सुरू होत आहेत. यामुळे मुले घर सोडण्याचा निर्णय घेत असून पालकांनीही घरातील संवाद वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.सामाजिक जबाबदारीघर सोडून जाणाºया मुलांची संख्या वाढत आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेवून येणाºया मुलांना समजावण्याचे कामही पोलीस करत आहेत.समुपदेशन केंद्रांची गरजअल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ९० टक्के मुलींना लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्या घर सोडून गेल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. घरातील भांडणांमुळेही लहान मुले, मुली घर सोडून जात आहेत. पालकांनी समजावून सांगितलेले मुले ऐकत नाहीत. घर सोडण्यास तयार होणाºया या मुलांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. योग्य समुपदेशन केल्यास यामधील बहुतांश घटना कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा