शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

बालपणाचे अपहरण; तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:20 IST

५०० अल्पवयीन मुलींचा समावेश

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पनवेल, नवी मुंबईसह उरण परिसरामध्ये अल्पवयीन मुले घर सोडून जाण्याचे व त्यांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये ५०० मुलींचा समावेश आहे. मुलींच्या अपहरणातील ४५८ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले असून बहुतांश घटना प्रेमप्रकरण व कौटुंबिक वादातून घडत असल्याचे उघडकीस आले आहे.मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता होण्यामुळे पालकांपुढील चिंता वाढत आहे. मागील काही वर्षांत अज्ञातांकडून घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. त्यानुसार मागील तीन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून एकूण ७२६ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ५०० गुन्हे मुलींच्या अपहरणाचे असून ४५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलींचा राज्यासह देशाच्या विविध भागातून शोध घेवून त्यांना पळवून नेणाऱ्यांना कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सर्वाधिक मुली प्रेमप्रकरणातून लग्नाच्या आमिषाला भुलून मुलांसोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. मुलींप्रमाणेच शहरातून तीन वर्षात २२६ मुलांच्या अपहरणाची नोंद पोलिसांकडे असून, त्यापैकी २१६ मुलांचा पोलिसांनी शोध घेवून पालकांच्या ताब्यात दिले आहे.अल्पवयीन मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांकडून कसून प्रयत्न होतात. परंतु चार महिन्यानंतरही त्यांचा शोध न लागल्यास हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासासाठी वर्ग केला जातो, अथवा संयुक्तरीत्या तपास केला जातो. त्यानुसार या पथकाने मागील तीन वर्षात स्वतंत्रपणे ६५ मुला-मुलींचा शोध घेतला आहे. यामुळे शहरातून जरी अल्पवयीन मुले-मुलींच्या अपहरणाचे प्रकार घडत असले, तरीही पोलिसांकडून त्याचा उलगडा करण्याचे कौशल्य दाखवले आहे. मात्र अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामागे सर्वाधिक प्रेमप्रकरणाचे कारण समोर येत असल्याचे गांभीर्य देखील पोलिसांकडून व्यक्त होत आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले जात आहे. अशा काही घटनांमध्ये परराज्यातील तरुणांची टोळी असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून परराज्यात पळवून नेण्यामागे टोळी सक्रिय असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.संवाद हरवतोयधावपळीच्या जीवनामध्ये पालक व मुलांमधील संवाद हरवू लागला आहे. पौगांडावस्थेमध्ये आलेल्या मुलांना पुरेसा वेळ पालकांकडून दिला जात नाही. यामुळे संवाद तुटतो व पुढे प्रेमप्रकरण किंवा मुलांच्या इतर तक्रारींमुळे घरांमध्ये भांडणे सुरू होत आहेत. यामुळे मुले घर सोडण्याचा निर्णय घेत असून पालकांनीही घरातील संवाद वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.सामाजिक जबाबदारीघर सोडून जाणाºया मुलांची संख्या वाढत आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेवून येणाºया मुलांना समजावण्याचे कामही पोलीस करत आहेत.समुपदेशन केंद्रांची गरजअल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ९० टक्के मुलींना लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्या घर सोडून गेल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. घरातील भांडणांमुळेही लहान मुले, मुली घर सोडून जात आहेत. पालकांनी समजावून सांगितलेले मुले ऐकत नाहीत. घर सोडण्यास तयार होणाºया या मुलांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. योग्य समुपदेशन केल्यास यामधील बहुतांश घटना कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा