शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

खारघरमध्ये रिक्षा चालकांची मनमानी सुरूच, बंदचा सातवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 07:13 IST

खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

पनवेल : खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, रिक्षा बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, महिला व विद्यार्थ्यांना बसला आहे.गेल्या मंगळवारी हद्दीच्या वादातून दोन संघटनेच्या रिक्षा चालकांत हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही संघटनेच्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. याविरोधात खारघर येथील एकता रिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. अटक केलेल्या रिक्षा चालकांची जोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत बंद मागे न घेण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला होता. सोमवारी अटक केलेल्या रिक्षा चालकांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यामुळे बंद मागे घेतला जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही बंद सुरूच ठेवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत. खारघरमध्ये दररोज हजारो प्रवासी रिक्षाने प्रवास करतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक शहराच्या बाहेर असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षाचा एकमेव पर्याय आहे.एनएमएमटीच्या बसेस आहेत, परंतु त्याही तुरळक असल्याने प्रवाशांची सर्व मदार रिक्षांवर आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून जवळपास आठशे रिक्षा संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यासंदर्भात नागरिकांत संताप पसरला असून मनमानी करणाºया रिक्षा चालकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.रिक्षा चालकांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटीने खारघरमधील बसेसच्या फेºया वाढविल्या आहेत, तर एसटी महामंडळाने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष दोन बस सुरु केल्या आहेत.रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसायला हवा. रहिवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. यात संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.- किरण कदम, रहिवासी, खारघर सेक्टर ७खारघर व तळोजा येथील रिक्षा संघटनांसमवेत सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत हद्दीवर तोडगा निघाला तरच रिक्षा सुरू होतील, असे खारघर एकता रिक्षा संघटनेने स्पष्ट केले आहे.रिक्षा चालकांच्या बंदबाबत बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढला जाईल. चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.- हेमांगिनी पाटील,प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलसलग सात दिवस रिक्षा बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांनीही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.- दीपक शिंदे,समाजसेवक,खारघर शहरंरिक्षा चालकांची कृती निंदनीय आहे. संध्याकाळी रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. बसला गर्दी असते.- रु पाली साटम, खारघर सेक्टर १0

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई