शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

खारघरमध्ये रिक्षा चालकांची मनमानी सुरूच, बंदचा सातवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 07:13 IST

खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

पनवेल : खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, रिक्षा बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, महिला व विद्यार्थ्यांना बसला आहे.गेल्या मंगळवारी हद्दीच्या वादातून दोन संघटनेच्या रिक्षा चालकांत हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही संघटनेच्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. याविरोधात खारघर येथील एकता रिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. अटक केलेल्या रिक्षा चालकांची जोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत बंद मागे न घेण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला होता. सोमवारी अटक केलेल्या रिक्षा चालकांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यामुळे बंद मागे घेतला जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही बंद सुरूच ठेवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत. खारघरमध्ये दररोज हजारो प्रवासी रिक्षाने प्रवास करतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक शहराच्या बाहेर असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षाचा एकमेव पर्याय आहे.एनएमएमटीच्या बसेस आहेत, परंतु त्याही तुरळक असल्याने प्रवाशांची सर्व मदार रिक्षांवर आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून जवळपास आठशे रिक्षा संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यासंदर्भात नागरिकांत संताप पसरला असून मनमानी करणाºया रिक्षा चालकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.रिक्षा चालकांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटीने खारघरमधील बसेसच्या फेºया वाढविल्या आहेत, तर एसटी महामंडळाने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष दोन बस सुरु केल्या आहेत.रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसायला हवा. रहिवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. यात संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.- किरण कदम, रहिवासी, खारघर सेक्टर ७खारघर व तळोजा येथील रिक्षा संघटनांसमवेत सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत हद्दीवर तोडगा निघाला तरच रिक्षा सुरू होतील, असे खारघर एकता रिक्षा संघटनेने स्पष्ट केले आहे.रिक्षा चालकांच्या बंदबाबत बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढला जाईल. चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.- हेमांगिनी पाटील,प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलसलग सात दिवस रिक्षा बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांनीही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.- दीपक शिंदे,समाजसेवक,खारघर शहरंरिक्षा चालकांची कृती निंदनीय आहे. संध्याकाळी रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. बसला गर्दी असते.- रु पाली साटम, खारघर सेक्टर १0

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई