शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कामोठेत रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:18 IST

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले. या महामार्गावर टोल नाका सुरू होऊन टोलवसुली देखील सुरू आहे. मात्र कामोठेकडून मुंबईच्या दिशेने जाणारा सायन- पनवेल महामार्ग मागील

वैभव गायकरपनवेल : सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले. या महामार्गावर टोल नाका सुरू होऊन टोलवसुली देखील सुरू आहे. मात्र कामोठेकडून मुंबईच्या दिशेने जाणारा सायन- पनवेल महामार्ग मागील चार वर्षे बंद आहे. प्रशासकीय यंत्रणेचा चालढकलपणा या गोष्टीला कारणीभूत ठरत आहे. कामोठेमधील समाजसेवक अमोल शितोळे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत धक्कादायक माहिती समोर आली असून चार वर्षांत याठिकाणी २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे .मागील चार वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. विशेष म्हणजे मानवनिर्मिती ही समस्या अनेकांच्या जीवावर उठत असून दररोज हजारो नागरिक, वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून कामोठेमधून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे सायन-पनवेल महामार्ग गाठण्यासाठी अनेकांना विरु द्ध दिशेने वाहने चालवावी लागत असल्याने दररोज प्रत्येकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आजवर कामोठेमधील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले, सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मात्र याठिकाणची एक वीटही हलत नसल्याने याठिकाणाहून जाणाºयाला आपला जीव धोक्यात घातल्याशिवाय पर्याय नाही. अशीच अवस्था निर्माण झाली आहे.कामोठेमधील समाजसेवक अमोल शितोळे यांनी माहितीच्या अधिकाराखाली २0१३ ते २0१७ च्या दरम्यान कामोठे याठिकाणी झालेल्या अपघातांची माहिती मागविली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चार वर्षांच्या कालावधीत याठिकाणी एकूण ५९ अपघात झाले असून त्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डिसेंबर २0१७ ची ही आकडेवारी आहे. पोलीस दप्तरी नोंद असलेली ही अपघातांची संख्या आहे. मात्र दररोज किरकोळ अपघात यामध्ये समाविष्ट केल्यास अपघातांची संख्या १00 च्या वर गेलेली आहे. कामोठे सिटीझन युनिटी फोरमच्या माध्यमातून फोरमचे अध्यक्ष अरु ण भिसे आणि सदस्य रंजना सडोलीकर व उत्कल घाडगे यांनी दोन महिन्यांपूर्वी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारघे यांची भेट घेतली होती. तेव्हा बंद रस्त्याच्या परिसरातील पाऊण गुंठा जमीन वन जमीन असल्याचे उघड झाले होते. त्यासाठी वन संवर्धन कायद्यांतर्गत एक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाला पाठवणे आवश्यक होते. मुंबई कांदळवन संधारण घटक विभागीय वन अधिकारी एम. एम. पंडितराव यांनी ५ डिसेंबर २0१७ ला उप वनसंरक्षक अलिबाग रस्ता लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.