शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

कळंबोली वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:42 IST

ठेकेदाराकडून वाहने पुरवली जात नसल्याने कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.

कळंबोली : ठेकेदाराकडून वाहने पुरवली जात नसल्याने कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. रस्त्यावरील कचराकुंड्या भरल्या आहेत, तर सोसायट्यांमधील बिन्समध्ये सुध्दा कचरा ठेवण्याकरिता जागा शिल्लक नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची सेवा हस्तांतरित करून घेतली आहे. हे काम सिडकोच्या ठेकेदाराला तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे. मात्र त्याच्याकडे वाहने नसल्याने कचरा उचलण्यात नियमितता नाही.सुरुवातीला एक दोन दिवस परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी आता जैसे थे स्थिती आहे. विशेष करून कळंबोली नोडमधील घनकचरा व्यवस्थापनाची अवस्था बिकट आहे. गेल्या तीन दिवसांपासून वसाहतीतील कचराच उचलला गेला नाही. त्यामुळे फायरब्रिगेड ते कळंबोली पोलीस ठाणे मार्गावर १०० मीटर अंतरावर कचराच कचरा दिसून येत आहे. केएलई कॉलेजच्या पाठीमागे, जाधव वाडीजवळील स्थिती फारशी वेगळी नाही. त्या व्यतिरिक्त ज्ञानमंदिर स्कूल, रोडपाली बस डेपो, सेक्टर-११ येथील नीलसंकुल, धन्वंतरी हॉस्पिटल व इतर अनेक ठिकाणी कचराच कचरा पडला आहे. सोसायट्यांच्या बाहेर ठेवलेल्या बिन्स भरून कचरा बाहेर पडला आहे. त्यामुळे रहिवाशांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.नादुरुस्त वाहनेसिडकोने नियुक्त केलेल्या कविराज इंटरप्रायझेसकडे वाहनांचा तुटवडा आहे. कळंबोलीकरिता असलेल्या चार गाड्यांपैकी दोन बंद आहेत आणि उर्वरित दोनपैकी एकच वाहनात रविवारी कचरा भरला जात होता तोही जेसीबीने. त्यामुळे जवळपास दीडशे टनापेक्षा जास्त कचरा या नोडमध्ये पडून आहे. त्याचबरोबर कामगारांना पूर्वीप्रमाणे ओव्हरटाइम दिला जात नसल्याने ते सुध्दा पाठ फिरवत आहेत. कमी कालावधीत जास्त काम आल्याने त्यांचीही दमछाक झाली आहे.सोशल मीडियावर कचराकळंबोली वसाहतीत साचलेल्या कचºयाचे फोटो क्लिक करून अनेकांनी ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे स्मार्ट समजल्या जाणाºया सिडको नोडची ही स्थिती असल्याच्या प्रतिक्रि या सोशल मीडियात येवू लागल्या आहेत.>गेले दोन दिवस कळंबोली नोडमध्ये गाडी नादुरुस्त होती. त्यामुळे काही ठिकाणचा कचरा उचलता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता हा कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच सोसायट्यांमध्येही बैठका घेतल्या जात आहे. नवीन गाड्या आल्यानंतर तक्र ारी येणार नाहीत.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका