शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

आठ वर्षांनंतर न्याय

By admin | Updated: March 17, 2015 01:10 IST

मुरुड एकदरा कोळी वाड्यातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबांच्या फिर्यादी रविवारी दाखल करण्यात आल्या.

जयंत धुळप ल्ल अलिबागमुरुड एकदरा कोळी वाड्यातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबांच्या फिर्यादी रविवारी दाखल करण्यात आल्या. त्यानुसार तडीपार करण्यात आलेल्या मोतीराम पाटील आणि अन्य १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड असिम सरोदे यांच्या माध्यमातून याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.एकदरा कोळी जात पंचायतीचा प्रमुख, हनुमान मच्छीमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि सध्या तडीपार असलेल्या मोतीराम चाया पाटील याच्याविरोधात २००७पासून अनेक तक्रारी मुरुड पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र गेली आठ वर्षे गुन्हे दाखल करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केली. मुंबई उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत १७ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वाळीत प्रकरणात एकाच दिवशी एकाच वेळी चार गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रश्मीकांत चंद्रकांत पाटील यांनी २००७मध्ये मोतीराम चाया पाटील अध्यक्ष असलेल्या, हनुमान मच्छीमार सहकारी संस्थेच्या सहकारी संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढल्याने त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे त्यांना कुटुंबासह मुंबईत गणेशनगर, वडाळा येथे राहायला जावे लागले. रश्मीकांत यांच्या तक्रारींची दखलच घेतली नाही. रश्मिकांत यांच्या कुटुंबीयांना सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत येण्यास बंदी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील महिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. रश्मीकांत यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. साक्ष दिल्याने सात वर्षे वाळीतगणेश आत्माराम दामशेट आणि नारायण जान्या पाटील या दोघांनी एकदरा गावातील जगन्नाथ मल्हारी वाघरे यांच्या बाजूने जातपंचायतीच्या विरुद्ध पोलिसांकडे साक्ष दिली होती. त्यामुळे वाघरे यांच्या कुटुंबाशी संबंध ठेवल्यामुळे दामशेट व पाटील यांना १६ जानेवारी २००८पासून वाळीत टाकण्यात आले. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण भिकू वाघरे यांचे काका मल्हारी वाघरे यांना वाळीत टाकल्यानंतर, त्यांच्या बोटीवर नारायण वाघरे यांनी तांडेल म्हणून काम करणे चालू ठेवल्याने व त्यांच्याशी बोलणे सुरूच ठेवल्याने वाघरे व त्यांच्या कुटुंबीयांना गावात फिरण्यास बंदी घालण्यात आली. त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या ग्रामस्थांकडून दंडाची मागणी करून दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणीही गुन्हा दाखल केला.