शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ भरतीदरम्यान जळगावच्या उमेदवाराचा मृत्यू, धुळ्याचा गंभीर

By नारायण जाधव | Updated: June 29, 2024 19:49 IST

पाच जण आजारी : डायघर पोलिसांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या एसआरपीएफ ग्रुप ११ च्या कॅम्प परिसरात भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची चाचणी सुरू असताना, काही उमेदवार जवानांना शरीरात अकड आणि उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता, यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडे या एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. यात धुळे येथील एका उमेदवाराची प्रकृती गंभीर असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले असून, चार जणांना आयसीसीयूमध्ये ठेवले आहे, तर एकास घरी सोडले आहे.

ठाण्यातील शीळफाटा परिसरात एसआरपीएफ भरती सुरू आहे. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने इच्छुक तरुण येथे आले आहेत. शनिवारी सकाळी भरतीप्रक्रियेतील धावण्याची चाचणी सुरू असताना, काही जणांनी चक्कर येणे, उलट्या होणे, अंगात अकड येणे अशा तक्रारी केल्या. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी काही उमेदवारांना सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास कळवा, ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच अक्षय बिऱ्हाडे यास रक्ताची उलटी झाली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले.

अक्षय बिराडे हा जळगावातील अमळनेर येथील रहिवासी होता. डॉ. बारोट यांनी सांगितले की, अक्षयचे शरीर ताठ झाले होते आणि त्याला उलट्या होत होत्या. त्याला न्यूमोनियाचीही तक्रार होती, तर धुळे येथील प्रेम ठाकरे (२९) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. याशिवाय पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर आडतकर (२३), साहिल किशोर लवण (१९) या चार जवानांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर अमित गायकवाड नावाच्या जवानाला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अक्षय बिऱ्हाडेच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे डॉ. बारोट यांनी सांगितले.

सकाळी भरतीदरम्यान उमेदवारांना पाच मिनिटांत ५०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करायची असते. अशावेळी अनेक उमेदवार शेवटच्या क्षणी जीव तोडून धावतात, त्यावेळी हा प्रकार घडला. यामुळे एकूण नऊ उमेदवारांना स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे अक्षय बिऱ्हाडे या उमेदवाराने आपल्या भावाशी बोलताना आपण बरे आहोत, असे सांगितले होते. मात्र, अचानक त्यास रक्ताची उलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.