शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ भरतीदरम्यान जळगावच्या उमेदवाराचा मृत्यू, धुळ्याचा गंभीर

By नारायण जाधव | Updated: June 29, 2024 19:49 IST

पाच जण आजारी : डायघर पोलिसांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या एसआरपीएफ ग्रुप ११ च्या कॅम्प परिसरात भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची चाचणी सुरू असताना, काही उमेदवार जवानांना शरीरात अकड आणि उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता, यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडे या एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. यात धुळे येथील एका उमेदवाराची प्रकृती गंभीर असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले असून, चार जणांना आयसीसीयूमध्ये ठेवले आहे, तर एकास घरी सोडले आहे.

ठाण्यातील शीळफाटा परिसरात एसआरपीएफ भरती सुरू आहे. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने इच्छुक तरुण येथे आले आहेत. शनिवारी सकाळी भरतीप्रक्रियेतील धावण्याची चाचणी सुरू असताना, काही जणांनी चक्कर येणे, उलट्या होणे, अंगात अकड येणे अशा तक्रारी केल्या. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी काही उमेदवारांना सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास कळवा, ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच अक्षय बिऱ्हाडे यास रक्ताची उलटी झाली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले.

अक्षय बिराडे हा जळगावातील अमळनेर येथील रहिवासी होता. डॉ. बारोट यांनी सांगितले की, अक्षयचे शरीर ताठ झाले होते आणि त्याला उलट्या होत होत्या. त्याला न्यूमोनियाचीही तक्रार होती, तर धुळे येथील प्रेम ठाकरे (२९) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. याशिवाय पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर आडतकर (२३), साहिल किशोर लवण (१९) या चार जवानांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर अमित गायकवाड नावाच्या जवानाला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अक्षय बिऱ्हाडेच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे डॉ. बारोट यांनी सांगितले.

सकाळी भरतीदरम्यान उमेदवारांना पाच मिनिटांत ५०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करायची असते. अशावेळी अनेक उमेदवार शेवटच्या क्षणी जीव तोडून धावतात, त्यावेळी हा प्रकार घडला. यामुळे एकूण नऊ उमेदवारांना स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे अक्षय बिऱ्हाडे या उमेदवाराने आपल्या भावाशी बोलताना आपण बरे आहोत, असे सांगितले होते. मात्र, अचानक त्यास रक्ताची उलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.