शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

‘त्या’ गावांच्या स्थलांतराचा तिढा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 23:50 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराचा तिढा वाढला आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराचा तिढा वाढला आहे. विशेष म्हणजे चार गावांतील ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणा-या दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने वेग घेतला आहे. तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा व वाघिवली या गावांचा यात सहभाग आहे. या गावांचे वाहळ, वडघर आणि कुंडे वाहळ या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. स्थलांतरित होणा-या गावांसाठी सध्या शाळेच्या दोन सुसज्ज इमारती बांधल्या आहेत; परंतु या शाळेत स्थलांतरित होण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. स्थलांतरित होणा-या प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यानुसार प्रत्येक गावासाठी स्वतंत्र शाळा मिळावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार सिडकोने प्रत्येक गावाला शाळेसाठी स्वतंत्र भूखंड देण्याचा निर्णय घेतला. तसे लेखी आश्वासनही ग्रामस्थांना दिले. परंतु हे भूखंड साठ वर्षांच्या लीजवर देवू केल्याने ग्रामस्थ आणि जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनीही त्याला विरोध केला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा परत देताना त्या मालकी हक्क तत्त्वावरच दिल्या जाव्यात, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याचा परिणाम म्हणून शाळांचे स्थलांतर रखडले.या सर्व घटनाक्रमाचा फटका गावांच्या स्थलांतराला बसला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा विमानतळावरून २0१९ मध्ये विमानाचे टेकआॅफ होईल, याबाबत साशंकता वर्तविली आहे.>गावांच्या स्थलांतराची सद्यस्थितीस्थलांतरित होणाºया दहा गावांपैकी कोपर, कोल्ही, वरचे ओवळे व वाघिवली या गावांतून सरासरी ९५ टक्के ग्रामस्थांनी आपली बांधकामे पाडून स्थलांतर केले आहे. विमानतळ प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात येणाºया उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे व तरघर या गावांतील ग्रामस्थांचा मात्र स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. विशेष म्हणजे स्थलांतरासाठी सिडकोने ३0 नोव्हेंबरची मुदत दिली होती. परंतु चार गाावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे सिडको प्रशासनासमोर नवा पेच निर्माणझाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई