शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांच्या स्थलांतराचा तिढा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 23:50 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराचा तिढा वाढला आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराचा तिढा वाढला आहे. विशेष म्हणजे चार गावांतील ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणा-या दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने वेग घेतला आहे. तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा व वाघिवली या गावांचा यात सहभाग आहे. या गावांचे वाहळ, वडघर आणि कुंडे वाहळ या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. स्थलांतरित होणा-या गावांसाठी सध्या शाळेच्या दोन सुसज्ज इमारती बांधल्या आहेत; परंतु या शाळेत स्थलांतरित होण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. स्थलांतरित होणा-या प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यानुसार प्रत्येक गावासाठी स्वतंत्र शाळा मिळावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार सिडकोने प्रत्येक गावाला शाळेसाठी स्वतंत्र भूखंड देण्याचा निर्णय घेतला. तसे लेखी आश्वासनही ग्रामस्थांना दिले. परंतु हे भूखंड साठ वर्षांच्या लीजवर देवू केल्याने ग्रामस्थ आणि जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनीही त्याला विरोध केला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा परत देताना त्या मालकी हक्क तत्त्वावरच दिल्या जाव्यात, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याचा परिणाम म्हणून शाळांचे स्थलांतर रखडले.या सर्व घटनाक्रमाचा फटका गावांच्या स्थलांतराला बसला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा विमानतळावरून २0१९ मध्ये विमानाचे टेकआॅफ होईल, याबाबत साशंकता वर्तविली आहे.>गावांच्या स्थलांतराची सद्यस्थितीस्थलांतरित होणाºया दहा गावांपैकी कोपर, कोल्ही, वरचे ओवळे व वाघिवली या गावांतून सरासरी ९५ टक्के ग्रामस्थांनी आपली बांधकामे पाडून स्थलांतर केले आहे. विमानतळ प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात येणाºया उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे व तरघर या गावांतील ग्रामस्थांचा मात्र स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. विशेष म्हणजे स्थलांतरासाठी सिडकोने ३0 नोव्हेंबरची मुदत दिली होती. परंतु चार गाावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे सिडको प्रशासनासमोर नवा पेच निर्माणझाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई