शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

इर्शाळवाडीची धोक्याची घंटा! पर्यावरणवाद्यांकडून रायगड ठाणे येथील डोंगरांच्या खोदकामावर बंदीसाठी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 17:52 IST

रायगड, ठाण्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांच्या सविस्तर अभ्यासाची देखील मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई: इर्शाळवाडीच्या दरड कोसळण्याची दु:खद घटना हा एक इशारा आहे. पर्यावरणवाद्यांनी डोंगरांच्या खोदकामावर तात्काळ प्रतिबंध आणण्याची विनंती केली आहे. रायगड, ठाण्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांच्या सविस्तर अभ्यासाची देखील मागणी करण्यात आली आहे.

डोंगर उतारांवरची माती सैल होण्याच्या स्वरुपात दूरवर परिणाम करणारे सततचे आणि उच्च तीव्रतेचे विस्फोट दरडी कोसळण्यासाठी कारणीभूत असू शकतात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान (एसइएपी) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये नमुद करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणांवर अनेक खोदकामे सुरु आहे आणि या अविवेकी खोदकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी समर्पित डोंगर विकास नियमन प्राधिकरणाची निर्मिती करण्याची आता नितांत आवश्यकता असल्याचे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले.“आम्ही पर्यावरणाचे चाहते, संपूर्ण राज्यातल्या डोंगरांवर होणारे विस्फोट, जंगलतोड आणि डोंगरांवर कोणत्याही नियमनाशिवाय होणा-या विकासाच्या विरुध्द सतर्कतेचा इशारा देत आहोत,” असे सांगत कुमार यांनी इरशालवाडीच्या दर कोसळण्याच्या घटनेचे “आपल्यासाठी ही आणखीन एक धोक्याची घंटा आहे” असे वर्णन केले आहे.

नॅटकनेक्टने आयआयटी/भारताचे भौगोलिक सर्वेक्षण यांच्या मदतीने डोंगरांवरच्या मातीच्या स्थितीचा सखोल अभ्यास करण्याची देखील विनंती केली आहे. शासनाने डोंगरांवर होणा-या विस्फोटांमुळे झालेल्या पर्यावरणाच्या –हासाचा जलद गतीने अभ्यास केला पाहिजे, असे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले.“मुसळधार पावसाने अगदी निर्विवादास्पदपणे दरड कोसळण्यात हातभार लावला आहे. पण आधी झालेली हानी आणि खोदकाम तसेच जंगलतोडीमुळे त्याचप्रमाणे अति ऊष्म्यामुळे माती सैल होण्याने ह्यात भर पाडली आहे”, असे पवार म्हणाले.  

शासनाने नवी मुंबई, ठाणे, उरण आणि खोदकाम होणा-या इतर सर्व स्थळांवरच्या परिस्थितीची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत पर्यावरणवादी समुहांनी सर्व डोंगरांवर त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांसारख्या बांधकामांच्या स्थळांवर विस्फोटांच्या भूकंपीय प्रभावाच्या तपासणीची विनंती देखील केली आहे. 

पारसिक हिल, येवूर हिल्स आणि खारघर हिल्स सारख्या दरड कोसळू शकणा-या ठिकाणांकडे शासनाचे लक्ष वळवले.डोंगर आणि टेकड्यांना धक्का पोहचवता कामा नये तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या सभोवताली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची आणि वृक्षतोडीची परवानगी देता कामा नये. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रभागांमधल्या आदिवासी व इतर कुटुंबांचे पंतप्रधान आवास योजने सारख्या प्रकल्पांच्या अंतर्गत त्यांच्या वर्तमान वसाहतींच्या नजीक पुनर्वसन केले जाऊ शकते, असे कुमार यांनी सूचवले. 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण