शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडी दरडग्रस्तांची नव्या घरात दिवाळी, लहान मुलांनी अंगणात फोडले फटाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 09:03 IST

Irshalwadi News: एक वर्षापेक्षा अधिक काळ विस्थापित अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश झाला. पंधरा दिवसांत स्थिरस्थावर झाल्यानंतर  येथील आदिवासी बांधवांनी दिवाळीचा उत्सव जल्लोषात साजरा केला.

 नवी मुंबई  - एक वर्षापेक्षा अधिक काळ विस्थापित अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश झाला. पंधरा दिवसांत स्थिरस्थावर झाल्यानंतर  येथील आदिवासी बांधवांनी दिवाळीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. विशेषत: लहान मुलांनी आपल्या हक्काच्या घरासमाेरील प्रशस्त अंगणात फटाके वाजवून दिवाळीचा आनंद लुटला. 

२७ जुलै २०२३ रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने  इर्शाळवाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. या आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने येथील नानिवली गावात २.६ हेक्टर जागेवर पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. सिडकोने अगदी निर्धारित कालावधीपेक्षा कमी काळात सर्व सुविधांनी युक्त असा हा पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ पक्की घरे बांधली आहेत. 

 विशेष म्हणजे आपदग्रस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ४४ भूखंडांवर ४४ घरे बांधण्यात आली आहेत.  पुनर्वसन प्रकल्पाची ही जागा काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर आहे. असे असले, तरी भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित जागेच्या सर्व बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पाणी, वीज आणि रस्ते आदी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :RaigadरायगडHomeसुंदर गृहनियोजन