शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमध्ये अनियमित पाणीपुरवठा : दिवाळीतच नवी मुंबईकरांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 04:46 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई - स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावरून स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेवून २४ तास पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. परंतु प्रत्यक्षात एमआयडीसी परिसराला अद्याप मोरबेचे पाणी पुरविण्यास सुरवात झालेली नाही. तुर्भे ते दिघापर्यंत लाखो नागरिकांना एमआयडीसीच्यावतीने पाणी देण्यात येत आहे. एमआयडीसीने शुक्रवारी शटडाउन घोषित केला असून शनिवार व रविवारी कमी दाबाने पाणी पुरविले जात आहे. माजी महापौर मनीषा भोईर यांनी स्थायी समितीमध्ये या विषयावर आवाज उठविला. श्रमिकनगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करत आहेत. अधिकाऱ्यांना याविषयी पाठपुरावा करून काहीच दखल घेतली जात नाही. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देविदास हांडे पाटील यांनीही एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याचे स्पष्ट केले. मोरबे धरणातील पाणी सर्व नवी मुंबई परिसराला मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात एमआयडीसीच्या शटडाउनमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली.राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनीही दिघा परिसरातील नागरिकांनाही गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी एमआयडीसी पाणी पुरवत नाही. शनिवार व रविवार कमी दाबाने पाणी येत असते. आठवड्यातून तीन दिवस पाणीच नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दिघा परिसरामध्ये जलकुंभ उभारण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एमआयडीसी परिसरातील नागरिकांना मोरबेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. परंतु अद्याप काम सुरू झाले नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पावले उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.जलकुंभाची गळती थांबवावाशी सेक्टर २ व ५ मधील जलकुंभाला गळती लागली आहे. या जलकुंभांची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनीही लवकरच या दोन्ही जलकुंभांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाईल असे आश्वासन दिले.पहिल्या आंघोळीला पाणी मिळेल का?नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करत असल्याचा दावा करते, परंतु प्रत्यक्षात एमआयडीसीमधील नागरिकांना गरजेपुरतेही पाणी उपलब्ध होत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले की, आठवड्यातील एक दिवस अजिबात पाणी मिळत नाही. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळते. किमान दिवाळीत पहिल्या आंघोळीसाठी तरी पाणी उपलब्ध होणार आहे का?एमआयडीसीमधील झोपडपट्टी व इतर सर्व वसाहतींना मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाय करावे. दिवाळीमध्ये व नंतरही शहरवासीयांना पाणीटंचाई भासू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी.- सुरेश कुलकर्णी,सभापती, स्थायी समितीश्रमिक नगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाणी मिळत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. आम्ही अधिकाºयांच्या ही गोष्टी निदर्शनास आणून दिली असून लवकरच पाणीप्रश्न सोडविण्यात यावा.- मनीषा भोईर,नगरसेविका, प्रभाग ४८

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका