शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

एमआयडीसीमध्ये अनियमित पाणीपुरवठा : दिवाळीतच नवी मुंबईकरांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 04:46 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई - स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावरून स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेवून २४ तास पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. परंतु प्रत्यक्षात एमआयडीसी परिसराला अद्याप मोरबेचे पाणी पुरविण्यास सुरवात झालेली नाही. तुर्भे ते दिघापर्यंत लाखो नागरिकांना एमआयडीसीच्यावतीने पाणी देण्यात येत आहे. एमआयडीसीने शुक्रवारी शटडाउन घोषित केला असून शनिवार व रविवारी कमी दाबाने पाणी पुरविले जात आहे. माजी महापौर मनीषा भोईर यांनी स्थायी समितीमध्ये या विषयावर आवाज उठविला. श्रमिकनगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करत आहेत. अधिकाऱ्यांना याविषयी पाठपुरावा करून काहीच दखल घेतली जात नाही. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देविदास हांडे पाटील यांनीही एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याचे स्पष्ट केले. मोरबे धरणातील पाणी सर्व नवी मुंबई परिसराला मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात एमआयडीसीच्या शटडाउनमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली.राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनीही दिघा परिसरातील नागरिकांनाही गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी एमआयडीसी पाणी पुरवत नाही. शनिवार व रविवार कमी दाबाने पाणी येत असते. आठवड्यातून तीन दिवस पाणीच नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दिघा परिसरामध्ये जलकुंभ उभारण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एमआयडीसी परिसरातील नागरिकांना मोरबेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. परंतु अद्याप काम सुरू झाले नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पावले उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.जलकुंभाची गळती थांबवावाशी सेक्टर २ व ५ मधील जलकुंभाला गळती लागली आहे. या जलकुंभांची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनीही लवकरच या दोन्ही जलकुंभांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाईल असे आश्वासन दिले.पहिल्या आंघोळीला पाणी मिळेल का?नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करत असल्याचा दावा करते, परंतु प्रत्यक्षात एमआयडीसीमधील नागरिकांना गरजेपुरतेही पाणी उपलब्ध होत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले की, आठवड्यातील एक दिवस अजिबात पाणी मिळत नाही. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळते. किमान दिवाळीत पहिल्या आंघोळीसाठी तरी पाणी उपलब्ध होणार आहे का?एमआयडीसीमधील झोपडपट्टी व इतर सर्व वसाहतींना मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाय करावे. दिवाळीमध्ये व नंतरही शहरवासीयांना पाणीटंचाई भासू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी.- सुरेश कुलकर्णी,सभापती, स्थायी समितीश्रमिक नगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाणी मिळत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. आम्ही अधिकाºयांच्या ही गोष्टी निदर्शनास आणून दिली असून लवकरच पाणीप्रश्न सोडविण्यात यावा.- मनीषा भोईर,नगरसेविका, प्रभाग ४८

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका