शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अंतर्गत रस्त्यावरील पार्किंगचा ताप; वाहतूककोंडीची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:00 IST

अवजड वाहनांचाही शिरकाव, अपघाताची शक्यता

नवी मुंबई : शहरात सध्या पार्किंगचा मुद्दा गंभीर बनला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या अरुंद आणि निमुळत्या रस्त्यावर ट्रक, डम्पर तसेच ट्रेलरसारखी अवजड वाहनेही पार्क केली जात असल्याने त्याचा ताप सर्वसामान्य रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

नवी मुंबईतील पार्किंगचे नियोजन फसले आहे. यातच मागील काही वर्षांत शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. उद्योगधंदे वाढीस लागले आहेत, त्यामुळे वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तेथे मानमानी पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अशाप्रकारची बेकायदा पार्किंग दिसून येते.

प्रमुख रस्ते, पदपथ तसेच शहरातील सार्वजनिक जागा अपुऱ्या पडू लागल्याने आता वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात. त्याचा फटका परिसरातील दळणवळण यंत्रणेला बसत आहे. निवासाच्या ठिकाणी किंवा इमारतीत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतर्गत रस्त्यावर रहिवासी आपली वाहने उभी करतात; परंतु आता त्यात अवजड वाहनांचीही भर पडू लागली आहे.

कोपरखैरणे परिसरातील बहुतांशी वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावर हे चित्र पाहावयास मिळते. विशेषत: कोपरखैरणेच्या खाडीकिनाºयालगतचा रस्ता, सेक्टर १९, सेक्टर १२ आदी परिसरातील रस्त्यावर सिलिंडरचे ट्रक, रसायनाने भरलेले टँकर आदी धोकादायक वाहने बेमालूमपणे पार्क केली जातात. मागील काही महिन्यांपासून अशा बेकायदा पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.महापालिकेची मोहीम ठप्परस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाई करणाºया सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाहनांचा अडथळा येत असल्याने रस्त्यांची योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही. त्याचा ठपका संबंधित कर्मचाºयांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु महापालिकेची ही मोहीमही ठप्प पडली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका