शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पनवेलमधील आंतरराज्यीय बस टर्मिनल प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 03:18 IST

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांना खो बसताना दिसत आहे. ऐरोली येथील दूतावास व खारघर येथील थीम सिटीचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर खांदेश्वर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्पही बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांना खो बसताना दिसत आहे. ऐरोली येथील दूतावास व खारघर येथील थीम सिटीचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर खांदेश्वर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्पही बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मागील तीन वर्षांत या प्रकल्पाच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे.विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे नवी मुंबईची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, अंतर्गत रस्त्यांचे जाळे, दणळवळणाच्या सुसज्ज सुविधा, रोजगारनिर्मिती आदींमुळे विविध राज्यांतील लोक नवी मुंबईकडे आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांत परराज्यातून शहरात येणाºया परिवहन उपक्रमांच्या बसेसच्या फेºया वाढल्या आहेत. या बसेसना अधिकृत थांबे नसल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, सीबीडी आणि कळंबोली आदी ठिकाणांहून प्रवासी घेतात.शहरात येणाºया या प्रवाशांच्या दृष्टीने हे असुरक्षित व गैरसोयीचे असल्याने परराज्यातून येणाºया शासकीय उपक्रमांच्या बसेसना एक अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने जाहीर केला होता. त्यासाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ ५ हेक्टरची जागाही निश्चित करण्यात आलीआहे.प्रकल्पासाठी २00 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. सिडकोच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २0१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या प्रकल्पाची डेडलाइन २0१८ पर्यंतची देण्यात आली होती. परंतु मागील तीन-साडेतीन वर्षांत सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे इतर बहुउद्देशीय प्रकल्पाप्रमाणे आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्पसुद्धा गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बस टर्मिनलचा प्रस्ताव अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याची कबुली सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी लोकमतला दिली.३00 बसेस पार्किंगची व्यवस्थापब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीटी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात टर्मिनलची भव्य इमारत, कॅन्टीनची सुविधा, बसेससाठी क्यू आकाराचे शेल्टर्स, पार्किंग तसेच टॅक्सी आणि रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आदी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या बस टर्मिनलमध्ये सुमारे ३00 बसेस पार्क करण्याची सुविधा असणार आहेत.बस टर्मिनलची उपयुक्तताशहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २0११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे. परंतु पायाभूत सुविधा विकसित करताना सिडकोने २0३१ पर्यंतच्या लोकसंख्येचा आधार घेतला आहे. त्यानुसार २0१३ मध्ये शहराची लोकसंख्या ४0 लाखांच्या घरात जाईल, असा ढोबळ अंदाज वर्तविला जात आहे. तसेच पुढील वीस वर्षांत जवळपास १४ लाख रोजगारनिर्मित्ती होईल, असा सिडकोचा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काळात रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून येणाºया परिवहन सेवेच्या बसेसचे आतापासूनच सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सिडकोने आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्प प्रस्तावित केला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई