शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अंबा खोरे प्रकल्पाचा जललेखा पुन्हा तयार करण्याचे निर्देश

By admin | Updated: November 9, 2016 05:59 IST

अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेतकऱ्यांना दुबार भातशेती करण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १९६९ मध्ये झालेल्या अंबा खोरे जल प्रकल्पातील

जयंत धुळप , अलिबागअलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेतकऱ्यांना दुबार भातशेती करण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १९६९ मध्ये झालेल्या अंबा खोरे जल प्रकल्पातील एक थेंबही पाणी अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ते मानकुळे (हाशिवरे) येथील शेतात गेल्या ४७ वर्षांत पोहोचले नाही. त्यातच १९८३ पासून म्हणजे गेल्या ३० वर्षांत शासनाच्या खारेपाट विभागास कोणताही निधी मिळाला नसल्याने सर्व बंधारे फुटून समुद्राचे खारेपाणी शेतीत घुसून त्या नापीक झाल्या. नापीक झालेल्या या भातशेतीच्या जमिनी कवडीमोल किमतीने टाटा-रिलायन्सच्या खासगी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना देवून त्याच कारखान्यांना अंबा खोरे प्रकल्पाचे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्याचा सरकारी घाट, मंगळवारी मुंबईत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता खलील अन्सारी व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या संयुक्त बैठकीत उघडकीस आला. अखेर अन्सारी यांना वस्तुस्थिती मान्य करून शेतकऱ्यांच्या बाजूनेच निर्णय घ्यावा लागल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी राजन भगत यांनी ‘लोकमत’कडे दिली आहे.संपूर्ण अंबा खोरे प्रकल्पाचे सर्वेक्षण करून नव्याने जललेखा बनविण्याचे निर्देश चर्चेतील पहिल्या मुद्याअंती अन्सारी यांनी दिले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकरिता असणारे पाणी कंपन्यांना मंजूर करण्यात आल्याचे या चर्चेच्यावेळी मान्य करण्यात आले. परिणामी ज्या कंपन्यांना अंबा खोरे प्रकल्पाचे पाणी मंजूर करण्यात आले त्या कंपन्याच अस्तित्वात आल्या नाहीत, ज्या कंपन्या खारेपाटातून रद्द झाल्याचे शासनाने जाहीर केले अशा कंपन्या मंजूर केलेले पाणी आणि सिंचनासाठी पाणी देण्यासाठी शासनाचे सादर केलेले प्रस्ताव अशा सर्व मुद्यांचा समावेश या ‘अंबा खोरे जललेखात’ करण्याचा निर्णय अन्सारी यांनी घेतला आहे.खारलॅण्ड विभागाला १९८३ पासून शासनाने निधीच दिला नसल्याने गेल्या ३० वर्षांत खारेपाटातील ३७ खार बांधबंदिस्ती योजना झाली ली नसल्याचेही या बैठकीत अभियंत्यांनी मान्य केले. या योजनांच्या बांधबंदिस्तीकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यात कुर्डूस ते माणकुळे (हाशिवरे) या खारबांधबंदिस्तीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल.