शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अंबा खोरे प्रकल्पाचा जललेखा पुन्हा तयार करण्याचे निर्देश

By admin | Updated: November 9, 2016 05:59 IST

अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेतकऱ्यांना दुबार भातशेती करण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १९६९ मध्ये झालेल्या अंबा खोरे जल प्रकल्पातील

जयंत धुळप , अलिबागअलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेतकऱ्यांना दुबार भातशेती करण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १९६९ मध्ये झालेल्या अंबा खोरे जल प्रकल्पातील एक थेंबही पाणी अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ते मानकुळे (हाशिवरे) येथील शेतात गेल्या ४७ वर्षांत पोहोचले नाही. त्यातच १९८३ पासून म्हणजे गेल्या ३० वर्षांत शासनाच्या खारेपाट विभागास कोणताही निधी मिळाला नसल्याने सर्व बंधारे फुटून समुद्राचे खारेपाणी शेतीत घुसून त्या नापीक झाल्या. नापीक झालेल्या या भातशेतीच्या जमिनी कवडीमोल किमतीने टाटा-रिलायन्सच्या खासगी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना देवून त्याच कारखान्यांना अंबा खोरे प्रकल्पाचे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्याचा सरकारी घाट, मंगळवारी मुंबईत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता खलील अन्सारी व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या संयुक्त बैठकीत उघडकीस आला. अखेर अन्सारी यांना वस्तुस्थिती मान्य करून शेतकऱ्यांच्या बाजूनेच निर्णय घ्यावा लागल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी राजन भगत यांनी ‘लोकमत’कडे दिली आहे.संपूर्ण अंबा खोरे प्रकल्पाचे सर्वेक्षण करून नव्याने जललेखा बनविण्याचे निर्देश चर्चेतील पहिल्या मुद्याअंती अन्सारी यांनी दिले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकरिता असणारे पाणी कंपन्यांना मंजूर करण्यात आल्याचे या चर्चेच्यावेळी मान्य करण्यात आले. परिणामी ज्या कंपन्यांना अंबा खोरे प्रकल्पाचे पाणी मंजूर करण्यात आले त्या कंपन्याच अस्तित्वात आल्या नाहीत, ज्या कंपन्या खारेपाटातून रद्द झाल्याचे शासनाने जाहीर केले अशा कंपन्या मंजूर केलेले पाणी आणि सिंचनासाठी पाणी देण्यासाठी शासनाचे सादर केलेले प्रस्ताव अशा सर्व मुद्यांचा समावेश या ‘अंबा खोरे जललेखात’ करण्याचा निर्णय अन्सारी यांनी घेतला आहे.खारलॅण्ड विभागाला १९८३ पासून शासनाने निधीच दिला नसल्याने गेल्या ३० वर्षांत खारेपाटातील ३७ खार बांधबंदिस्ती योजना झाली ली नसल्याचेही या बैठकीत अभियंत्यांनी मान्य केले. या योजनांच्या बांधबंदिस्तीकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यात कुर्डूस ते माणकुळे (हाशिवरे) या खारबांधबंदिस्तीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल.