शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जखमी पक्ष्यांना, प्राण्यांना आता उपचाराचा 'आधार' राज्यात वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 11:01 IST

Wild Life: नवी मुंबई येथील पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यासह राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेकदा विविध कारणास्तव अनेक प्राणी, पक्षी जखमी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - येथील पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यासह राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेकदा विविध कारणास्तव अनेक प्राणी, पक्षी जखमी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा जखमी पशु पक्ष्यांसह प्राण्यांवर उपचार करून त्यांच्या संवर्धनासाठी राज्यात आता वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण ६१९०६.०५ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून, त्याचे भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण २०.१२ टक्के आहे. या वनांमधील वन्यजीव व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२च्या तरतुदीनुसार राज्यामध्ये उपरोक्त ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्र अधिसूचित केली आहेत.

यासाठी आहे वन्य प्राणी अपंगालयाची गरजराज्यातील व्याघ्र प्रकल्पांसह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांत विविध जाती-प्रजातीच्या वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. यात अनेक दुर्मिळ प्राण्यांचाही समावेश आहे. मात्र, अनेकदा या क्षेत्रांत विविध प्राण्यांच्या हल्ल्यात वा अन्य कारणास्तव अनेक प्राणी गंभीर जखमी होतात. मात्र, उपचार करून त्यांचे संवर्धन करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या सोयीसुविधा फारच तोकड्या आहेत. हे लक्षात घेऊन राज्याच्या वन विभागाने वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना केली आहे. आता पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाची मान्यता घेतल्यानंतर या वन्य प्राणी अपंगालयाचा मार्ग सुकर होणार आहे.

दुर्मीळ वन्य प्राण्यांचे संवर्धन करणारयात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या प्राण्यांची देखभाल करणे, मानवी जीवितास धोकादायक असलेल्या प्राण्यांना वेळप्रसंगी कायमचे जेरबंद करण्याकरिता वन्य प्राणी बचाव केंद्राची अर्थात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरची निर्मितीही या अंतर्गत करण्यात येणार आहे. याकरिता विविध क्षेत्रीय स्तरावर उपयुक्त अशी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यामध्ये नामशेष होणाऱ्या दुर्मीळ वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी सुविधा निर्माण करून वन्यजीव संरक्षणाचा उद्देशसुद्धा वन्य प्राणी अपंगालयाच्या स्थापनेमागे आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNavi Mumbaiनवी मुंबई