शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जखमी पक्ष्यांना, प्राण्यांना आता उपचाराचा 'आधार' राज्यात वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 11:01 IST

Wild Life: नवी मुंबई येथील पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यासह राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेकदा विविध कारणास्तव अनेक प्राणी, पक्षी जखमी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - येथील पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यासह राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेकदा विविध कारणास्तव अनेक प्राणी, पक्षी जखमी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा जखमी पशु पक्ष्यांसह प्राण्यांवर उपचार करून त्यांच्या संवर्धनासाठी राज्यात आता वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण ६१९०६.०५ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून, त्याचे भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण २०.१२ टक्के आहे. या वनांमधील वन्यजीव व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२च्या तरतुदीनुसार राज्यामध्ये उपरोक्त ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्र अधिसूचित केली आहेत.

यासाठी आहे वन्य प्राणी अपंगालयाची गरजराज्यातील व्याघ्र प्रकल्पांसह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांत विविध जाती-प्रजातीच्या वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. यात अनेक दुर्मिळ प्राण्यांचाही समावेश आहे. मात्र, अनेकदा या क्षेत्रांत विविध प्राण्यांच्या हल्ल्यात वा अन्य कारणास्तव अनेक प्राणी गंभीर जखमी होतात. मात्र, उपचार करून त्यांचे संवर्धन करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या सोयीसुविधा फारच तोकड्या आहेत. हे लक्षात घेऊन राज्याच्या वन विभागाने वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना केली आहे. आता पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाची मान्यता घेतल्यानंतर या वन्य प्राणी अपंगालयाचा मार्ग सुकर होणार आहे.

दुर्मीळ वन्य प्राण्यांचे संवर्धन करणारयात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या प्राण्यांची देखभाल करणे, मानवी जीवितास धोकादायक असलेल्या प्राण्यांना वेळप्रसंगी कायमचे जेरबंद करण्याकरिता वन्य प्राणी बचाव केंद्राची अर्थात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरची निर्मितीही या अंतर्गत करण्यात येणार आहे. याकरिता विविध क्षेत्रीय स्तरावर उपयुक्त अशी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यामध्ये नामशेष होणाऱ्या दुर्मीळ वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी सुविधा निर्माण करून वन्यजीव संरक्षणाचा उद्देशसुद्धा वन्य प्राणी अपंगालयाच्या स्थापनेमागे आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNavi Mumbaiनवी मुंबई