शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

पुनर्बांधणीच्या परवानगीसाठी अडवणूक

By admin | Updated: March 23, 2017 01:46 IST

मोडकळीस आलेल्या शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे.

कमलाकर कांबळे / नवी मुंबई मोडकळीस आलेल्या शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास दहा प्रकरणात ना हरकत देवू करण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्ष प्रमाणपत्र देताना सिडकोच्या वसाहत विभागाकडून अर्जदारांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.सिडकोनिर्मित जुन्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आल्याने त्या धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने अडीच चटई निर्देशांक मंजूर केला आहे. मात्र त्यासाठी सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने पुनर्बांधणीच्या कामाला खीळ बसली. राज्य सरकारच्या फेब्रुवारी २0१५ रोजीच्या अध्यादेशानुसार पुनर्बांधणीसाठी असोसिएशनमधील १00 टक्के रहिवाशांची तर सोसायटीमधील ७0 टक्के रहिवाशांची अनुमती असणे आवश्यक आहे. नेमका हाच कळीचा मुद्दा बनल्याने सुरुवातीच्या काळात सिडकोने ना हरकत देण्यास असमर्थता दर्शविली. मात्र राजकीय हस्तक्षेप व इतर कारणांमुळे असोसिएशनमधील सर्वच रहिवाशांची अनुमती मिळत नाही. त्यामुळे सोसायटी स्थापन करून किमान ७0 टक्के रहिवाशांच्या मान्यतेवर पुनर्बांधणीसाठी ना हरकत द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली. यासंदर्भात अनेकांनी न्यायालयातही धाव घेतली. नियम व अटींमुळे नाहक रहिवाशांना वेठीस धरणे उचित ठरणार नाही, ही बाब राज्य सरकार व सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेवून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी पुनर्बांधणीसाठी ना हरकत देण्याचे धोरण अवलंबिले. सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनीही यात आग्रही भूमिका घेतली. त्यानुसार आतापर्यंत पुनर्बांधणीच्या जवळपास आठ ते दहा प्रकरणांना तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. मात्र महिना उलटला तरी अर्जदारांना अद्याप प्रत्यक्ष ना हरकत प्रमाणपत्राचा ताबा मिळालेला नाही. सिडकोच्या वसाहत विभागाकडून या अर्जदारांची नाहक अडवणूक केली जात आहे. विविध कारणे पुढे करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यास विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जावू लागली आहे.