शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

उन्हाळ्यात महागाईचा चटका, डाळी,कडधान्याचे दर कडाडले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:10 IST

तुटवडा सुरू; तीन महिन्यांत ३ ते ७ टक्के दर वाढले, आयातही मंदावली

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशात डाळी, कडधान्यांचे उत्पादन कमी झाले असून, आयातही मंदावली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. तीन महिन्यांत प्रत्येक वस्तूंचे दर ३ ते ७ टक्के वाढले आहेत. घाऊक बाजारामध्ये मसूरडाळीनेही शंभरी ओलांडली आहे. उन्हाळ्यामध्येच तेजी सुरू झाल्यामुळे संपूर्ण वर्षभर ही भाववाढ सुरू राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गहू, तांदूळ उत्पादनामध्ये भारत स्वावलंबी झाला आहे. परंतु, कडधान्याच्या बाबतीत अद्याप आत्मनिर्भर होता आलेले नाही. देशवासीयांना वर्षभर पुरेल एवढ्या कडधान्याचे उत्पादन होत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. 

गतवर्षी उत्पादन घटले व आयातही कमी प्रमाणात होत असल्यामुळे २०२४ च्या सुरूवातीपासून डाळी, कडधान्यांचे दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ७० ते ७८ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या मसूरडाळीचे दर ७१ ते ११५ रुपयांवर पोहोचले आहेत. हरभरा डाळ ६५ ते ७८ वरून ६८ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे.  बाजार समितीमध्ये सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्यांची प्रतिदिन ८०० ते ९०० टन आवक होत आहे. यावर्षी पाऊस वेळेत पडला तर दर स्थिर राहतील. वेळेत पेरणी झाली नाही तर वर्षभर दर वाढत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तीन महिन्यांत चणाडाळ ३ टक्के, चणे ६.५ टक्के, मूगडाळीच्या दरात ३ टक्के वाढ झाली आहे.

देशांतर्गत कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. आयातही कमी होत असल्यामुळे दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. पुढील वर्षभर दरामध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. - नीलेश विरा, संचालक, धान्य मार्केट 

मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव (प्रतिकिलो) वस्तू    फेब्रुवारी    एप्रिल 

  • हरभरा    ६० ते ८०    ६० ते ८५
  • हरभरा डाळ    ६५ ते ७८    ६८ ते ८५
  • मसूर     ६४ ते ७५    ६५ ते ८५
  • मसूर डाळ     ७० ते ७८    ७१ ते ११५
  • उडीद     ७० ते ११२    ८३ ते ११५
  • उडीदडाळ     ९५ ते १४०    १०० ते १५०
  • मूग     ८८ ते ११६    ९५ ते १५०
  • मूगडाळ    ९५ ते १४०    ९९ ते १४०
  • तूरडाळ    ९२ ते १७०    ११० ते १७० 
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईInflationमहागाई