शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

डांबरीकरणासाठी निकृष्ट साहित्य; महापालिकेचे नियंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:34 IST

कोट्यवधींचा खर्च वाया जाण्याची भीती

नवी मुंबई : स्वच्छ अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम घाऊक प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी गरज नसतानाही डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जाहीन असल्याचे दिसून आले आहे. कामाचा दर्जा तपासणारी महापालिकेची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. कामाच्या ठिकाणी महापालिकेचे अभियंते दिसत नाहीत. त्यामुळे डांबरीकरणाच्या नावाखाली कंत्राटदारांकडून महापालिकेची किंबहुना शहरवासीयांची निव्वळ फसवणूक केली जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

स्वच्छ अभियानांतर्गत महापालिकेने शहराचा कायापालट केला आहे. चौक, सार्वजनिक जागा, उद्याने, मैदाने तसेच भिंती अगदी चकाचक करण्यात आल्या. रस्त्यांची दिवसांतून दोन वेळा साफसफाई करण्यात आली. रस्त्यांचे युद्धपातळीवर डांबरीकरण करण्यात आले. आवश्यकता नसलेल्या रस्त्यांवरही डांबराचे थर टाकण्यात आले. स्वच्छता अभियानाचे परीक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही काही भागात डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांवर कोणाचेही नियंत्रण नाही.

कंत्राटदारांकडून मनमानी पद्धतीने कामे उरकली जात आहेत. डांबरीकरणापूर्वी रस्त्यांना खाचा पाडणे गरजेचे असते. त्यानंतर त्यावर आॅइलची शिंपड केली जाते. हे आॅइल पूर्णत: मुरल्यानंतर डांबराचा थर टाकण्याची पद्धत आहे. मात्र, अनेक ठिकाणी डांबरीकरणापूर्वी रस्त्यांवर केवळ झाडू फेरला जात आहे. त्यानंतर आॅइल शिंपडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यात आॅइलचे प्रमाण कमी मात्र पाणी अधिक असल्याचे दिसून आले आहे. कंत्राटदारांकडून केल्या जाणाºया कामांवर महापालिकेच्या संबंधित विभागाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही.

गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. थांबून थांबून कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली होती, त्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवताना प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यासंदर्भात जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया पाहून महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार स्वच्छ अभियानाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या डांबरीकरणाचा धडाका सुरू करण्यात आला.

एकाच वेळी शहराच्या विविध भागात कोट्यवधी रुपयांची ही कामे सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, कामाचा दर्जा तपासल्यानंतरच संबंधित ठेकेदारांना त्यांच्या बिलाची रक्कम दिली जाईल, असेही आयुक्त मिसाळ यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या आणि यापूर्वी पूर्ण झालेल्या डांबरीकरणाच्या दर्जाबाबत महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र