शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरणासाठी निकृष्ट साहित्य; महापालिकेचे नियंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:34 IST

कोट्यवधींचा खर्च वाया जाण्याची भीती

नवी मुंबई : स्वच्छ अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम घाऊक प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी गरज नसतानाही डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जाहीन असल्याचे दिसून आले आहे. कामाचा दर्जा तपासणारी महापालिकेची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. कामाच्या ठिकाणी महापालिकेचे अभियंते दिसत नाहीत. त्यामुळे डांबरीकरणाच्या नावाखाली कंत्राटदारांकडून महापालिकेची किंबहुना शहरवासीयांची निव्वळ फसवणूक केली जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

स्वच्छ अभियानांतर्गत महापालिकेने शहराचा कायापालट केला आहे. चौक, सार्वजनिक जागा, उद्याने, मैदाने तसेच भिंती अगदी चकाचक करण्यात आल्या. रस्त्यांची दिवसांतून दोन वेळा साफसफाई करण्यात आली. रस्त्यांचे युद्धपातळीवर डांबरीकरण करण्यात आले. आवश्यकता नसलेल्या रस्त्यांवरही डांबराचे थर टाकण्यात आले. स्वच्छता अभियानाचे परीक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही काही भागात डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांवर कोणाचेही नियंत्रण नाही.

कंत्राटदारांकडून मनमानी पद्धतीने कामे उरकली जात आहेत. डांबरीकरणापूर्वी रस्त्यांना खाचा पाडणे गरजेचे असते. त्यानंतर त्यावर आॅइलची शिंपड केली जाते. हे आॅइल पूर्णत: मुरल्यानंतर डांबराचा थर टाकण्याची पद्धत आहे. मात्र, अनेक ठिकाणी डांबरीकरणापूर्वी रस्त्यांवर केवळ झाडू फेरला जात आहे. त्यानंतर आॅइल शिंपडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यात आॅइलचे प्रमाण कमी मात्र पाणी अधिक असल्याचे दिसून आले आहे. कंत्राटदारांकडून केल्या जाणाºया कामांवर महापालिकेच्या संबंधित विभागाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही.

गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. थांबून थांबून कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली होती, त्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवताना प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यासंदर्भात जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया पाहून महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार स्वच्छ अभियानाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या डांबरीकरणाचा धडाका सुरू करण्यात आला.

एकाच वेळी शहराच्या विविध भागात कोट्यवधी रुपयांची ही कामे सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, कामाचा दर्जा तपासल्यानंतरच संबंधित ठेकेदारांना त्यांच्या बिलाची रक्कम दिली जाईल, असेही आयुक्त मिसाळ यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या आणि यापूर्वी पूर्ण झालेल्या डांबरीकरणाच्या दर्जाबाबत महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र