शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

इंदिरानगरचे रहिवासी मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 04:10 IST

दुर्घटनेची शक्यता; घरांवर विद्युत वाहिन्यांचे जाळे

नवी मुंबई : तुर्भेतील इंदिरानगर परिसरातील रहिवासी उपरी विद्युत वाहिन्यांखाली जीव मुठीत घेऊन राहत आहेत. जागोजागी विद्युत वाहिन्यांचे जाळे तयार झाले असून, त्याचा शॉक लागून अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. भविष्यात त्या ठिकाणी एखाद्या छोट्याशा आगीमुळे देखील अग्नितांडव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तुर्भे एमआयडीसी परिसराला लागूनच इंदिरानगर वसाहत निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीला शेकडोच्या वर कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्यापैकी अनेकांनी बैठ्या चाळीतील घरांची पुनर्बांधणी करून एक किंवा दोन मजल्यांची घरे बांधली आहेत. मात्र, वाढत्या बांधकामांमुळे रहिवाशांचेही जीव धोक्यात आले आहेत. जागोजागी असणाऱ्या विजेच्या खांबाला लागूनच बहुतांश घरे आहेत. काही ठिकाणी घरांच्या खिडक्या, दरवाजे यापासून हाताच्या अंतरावर एकत्रित विद्युत वायरची जोडणी झालेली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा अथवा मुलाचा नकळतपणे वायरला स्पर्श झाल्यास त्याचे प्राणदेखील जाऊ शकतात. अनेकदा पावसात विजेच्या खांबामधूनही विजेचा प्रवाह होतो. अशा वेळी तिथे खेळणाºया मुलांचा त्या खांबाला स्पर्श होऊन शॉक लागण्याचे अथवा काही कारणाने उपरी वायर तुटून अंगावर अथवा घरावर पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच परिसरात एखादी छोटीशी लागलेली आगदेखील संपूर्ण इंदिरानगर परिसरात अग्नितांडव पसरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छतांवर मोठ्या प्रमाणात पसरलेले प्लॅस्टिक त्यासाठी कारणीभूत ठरू शकते.पावसाळ्यात घरामध्ये पाणी ठिपकू नये, याकरिता अनेक जण घरांवर प्लॅस्टिक पसरवून टाकतात. या कामा वेळी उपरी विद्युत वाहिनीला नकळत स्पर्श होऊन शॉक लागण्याच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारांमुळे प्रतिवर्षी दोन ते तीन व्यक्तींचे प्राण जात आहेत. यामुळे संपूर्ण परिसरावर पसरलेले विद्युत वाहिन्यांचे जाळे हटवून उपरी वायर भूमिगत करण्याची मागणीदेखील अनेकांनी केलेली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून त्याचे फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.इंदिरानगरमधील उपरी विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यूच्या घटना घडत आहेत. यामुळे तिथल्या वायर भूमिगत करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी वीज वितरणच्या अधिकाºयांना देखील लेखी कळवलेले आहे. त्यानंतरही ठोस पर्याय राबवला जात नसल्याने भविष्यात त्या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.- महेश कोटीवाले,विभागप्रमुख, शिवसेना

टॅग्स :electricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई