शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

अपक्षांची २९ हजार मतांची उडी

By admin | Updated: May 30, 2017 06:24 IST

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्षांनी २९ हजार मतांचा पल्ला गाठला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ८ हजार चारशे

मयूर तांबडे /लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्षांनी २९ हजार मतांचा पल्ला गाठला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ८ हजार चारशे ५९ मते मिळाली. काही ठिकाणी अपक्षांच्या मतांमुळे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या सुरु वातीला अपक्ष उमेदवारांनी भल्याभल्यांना घाम फोडला. निवडणुकीत इच्छुक असलेल्या मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यापैकी काही अपक्षांना थोपविण्यात पक्षाला यश आले होते. मात्र काहींनी निवडणूक लढवत अक्षरश: घाम फोडला. काही प्रभागात अपक्षांची मते निर्णायक ठरली. पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात प्रभाग क्र मांक ८ ड मधून रोहन पाटील यांना सर्वाधिक १ हजार ५५५ मते मिळाली. प्रभाग १८ ड मधून मधुकर पिसाळ यांना सर्वात कमी म्हणजेच १५ मते मिळाली. एकही अपक्ष निवडून आलेला नसला तरी देखील काहींच्या पराभवाला अपक्ष जबाबदार ठरला असल्याचे दिसून आले आहे. ८७ अपक्षांना एकूण २८ हजार ७५१ मते मिळाली, तर मनसेला केवळ ८ हजार चारशे ५९ मिळाली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये नवनिर्माण करण्याचा चंग बांधत खारघर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आदी परिसरात २५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या निवडणुकीत मनसेला केवळ ८ हजार ४५९ मते मिळाली. यात प्रभाग क्र मांक १५ ड मधील संतोष सरगर यांना सर्वाधिक ८१२ मते मिळाली तर प्रभाग ८ क मधील गिरीश तिवारी यांना सर्वात कमी ७० मते मिळाली. मनसेला देखील या निवडणुकीत यश मिळाले नाही त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले ४ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यांना केवळ ३९३ मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघातर्फे २६ उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यात त्यांना एकूण ४ हजार ४३० मते मिळाली. प्रभाग क्र मांक ४ ब मधील उमेदवार सुनीता सोनावणे यांना सर्वाधिक ३९८ मते मिळाली. बहुजन मुक्ती पार्टीने १२ ठिकाणी आपले उमेदवार निश्चित करत निवडणुकीत उतरविले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारत केवळ १ हजार ४०८ मते मिळाली.पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत बसपा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडी, अखिल भारतीय सेना, स्वाभिमानी पक्ष, धर्मराज्य पक्ष, बळीराजा पार्टी यांनी आपापले उमेदवाराना संधी दिली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. भारतीय जनता पार्टीला ५१ तर शेकाप आघाडीने २७ जागा जिंकल्या.