शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांची २९ हजार मतांची उडी

By admin | Updated: May 30, 2017 06:24 IST

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्षांनी २९ हजार मतांचा पल्ला गाठला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ८ हजार चारशे

मयूर तांबडे /लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्षांनी २९ हजार मतांचा पल्ला गाठला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ८ हजार चारशे ५९ मते मिळाली. काही ठिकाणी अपक्षांच्या मतांमुळे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या सुरु वातीला अपक्ष उमेदवारांनी भल्याभल्यांना घाम फोडला. निवडणुकीत इच्छुक असलेल्या मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यापैकी काही अपक्षांना थोपविण्यात पक्षाला यश आले होते. मात्र काहींनी निवडणूक लढवत अक्षरश: घाम फोडला. काही प्रभागात अपक्षांची मते निर्णायक ठरली. पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात प्रभाग क्र मांक ८ ड मधून रोहन पाटील यांना सर्वाधिक १ हजार ५५५ मते मिळाली. प्रभाग १८ ड मधून मधुकर पिसाळ यांना सर्वात कमी म्हणजेच १५ मते मिळाली. एकही अपक्ष निवडून आलेला नसला तरी देखील काहींच्या पराभवाला अपक्ष जबाबदार ठरला असल्याचे दिसून आले आहे. ८७ अपक्षांना एकूण २८ हजार ७५१ मते मिळाली, तर मनसेला केवळ ८ हजार चारशे ५९ मिळाली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये नवनिर्माण करण्याचा चंग बांधत खारघर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आदी परिसरात २५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या निवडणुकीत मनसेला केवळ ८ हजार ४५९ मते मिळाली. यात प्रभाग क्र मांक १५ ड मधील संतोष सरगर यांना सर्वाधिक ८१२ मते मिळाली तर प्रभाग ८ क मधील गिरीश तिवारी यांना सर्वात कमी ७० मते मिळाली. मनसेला देखील या निवडणुकीत यश मिळाले नाही त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले ४ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यांना केवळ ३९३ मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघातर्फे २६ उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यात त्यांना एकूण ४ हजार ४३० मते मिळाली. प्रभाग क्र मांक ४ ब मधील उमेदवार सुनीता सोनावणे यांना सर्वाधिक ३९८ मते मिळाली. बहुजन मुक्ती पार्टीने १२ ठिकाणी आपले उमेदवार निश्चित करत निवडणुकीत उतरविले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारत केवळ १ हजार ४०८ मते मिळाली.पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत बसपा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडी, अखिल भारतीय सेना, स्वाभिमानी पक्ष, धर्मराज्य पक्ष, बळीराजा पार्टी यांनी आपापले उमेदवाराना संधी दिली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. भारतीय जनता पार्टीला ५१ तर शेकाप आघाडीने २७ जागा जिंकल्या.