शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

रसायनीत वणव्यांचे वाढले प्रमाण

By admin | Updated: November 22, 2014 22:32 IST

भातकापणी पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरच्या मध्यापासूनच वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होत असते. यात वन्य पशू-पक्ष्यांसोबतच रानातील औषधी वनस्पतीही खाक होत आहेत.

मोहोपाडा : भातकापणी पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरच्या मध्यापासूनच वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होत असते. यात वन्य पशू-पक्ष्यांसोबतच रानातील औषधी वनस्पतीही खाक होत आहेत. सध्या रसायनी- पाताळगंगा परिसरात काही जंगलांना वणवे लागण्याच्या घटना घडत असून या समस्येकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी वणवे लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. अनेकदा मानवी चुकांमुळे हे वणवे लागत आहेत. मात्र हे वणवे रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई होत नसल्याने वणवा लावणा:यांचे फावत असल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे. 
वणवा लागण्याच्या घटना वाढल्याने गुरांसाठी जंगलातून चारा मिळणोही कठीण झाले आहे. दरम्यान, भातशेतीची कामे पूर्ण झाल्यावर वणवा लावण्याची पद्धत काही ठिकाणी रूढ आहे, तर काही शेतकरी शेतातील कचरा जाळण्यासाठी वणवा लावतात. 
आग वेळीच आटोक्यात न आणल्याने पसरते आणि तिचे वणव्यात रूपांतर होते, त्यामुळे जंगल भागात राहणा:या आदिवासी, ठाकर जमातीची घरे यात सर्रास खाक होतात. पर्यावरणाचा :हास रोखण्यासाठी वन विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे. (वार्ताहर)