शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

किरकोळ वादातून वाढल्या हत्या, वाढता तणाव जातोय विकोपाला; पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:07 IST

गतवर्षात हत्येच्या २४ घटना घडल्या असून, त्यामागे किरकोळ वादाचे कारण असल्याचे तपासात समोर आलेले आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : गतवर्षात हत्येच्या २४ घटना घडल्या असून, त्यामागे किरकोळ वादाचे कारण असल्याचे तपासात समोर आलेले आहे. यावरून वाढता मानसिक तणाव विकोपाला जाऊन, हत्या घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर घालण्याचे नवे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.नवी मुंबईत (परिमंडळ एक) तीन वर्षांत एकूण ११५ हत्या झाल्या आहेत. २०१५मध्ये ४९, २०१६मध्ये ४२, तर २०१७मध्ये २४ हत्या झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपेक्षा २०१७मध्ये हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. तर घडलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वाधिक हत्या आपसातील किरकोळ वादातून घडल्या आहेत. गतवर्षात घडलेल्या २४ हत्यांपैकी २३ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी अत्यंत शिताफीने केली आहे; परंतु उकल झालेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडलेल्या गुन्ह्यांऐवजी किरकोळ वादातून घडलेले गुन्हेच सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे किरकोळ भांडणांचा वाढता तणाव विकोपाला जाऊन गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. कोणताही पूर्वनियोजित कट न रचता, रागाच्या भरात त्याचक्षणी हे गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये पती- पत्नीचे भांडण, व्यवसायातून झालेले किरकोळ वाद, अथवा पूर्ववैमनस्य अशा प्रमुख कारणांचा अधिक समावेश आहे. त्यापैकी पती-पत्नीतील वादाला, चारित्र्य संशयाचे कारण गंभीर ठरत आहे. पत्नीची एखाद्या पुरुषासोबत असलेली जवळीक, पतीच्या मनात निर्माण झालेला संशय वेळीच दूर न झाल्यास त्यांच्यात वाद होत आहेत, अशी काही प्रकरणे टोकाला जाण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यातले गैरसमज दूर करण्याचीही भूमिकाही बजावलेली आहे; परंतु चर्चेतून प्रश्न मिटवण्याऐवजी संशय डोक्यातच ठेवल्याने वाद विकोपाला जात आहेत. अशाच प्रकारातून पतीने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा २०१७च्या अखेरीस घडला होता. तर प्रेमसंबंधातून लग्नाला भाग पाडल्याने लग्नाच्या चौथ्या दिवशी तिची हत्या करून तुकडे केल्याचा प्रकार मुंबईत घडला होता. या गुन्ह्याची उकल नवी मुंबई पोलिसांनी रबाळे एमआयडीसी हद्दीत सापडलेल्या शिर नसलेल्या धडावरून केली होती. त्याशिवाय घणसोली गावामध्ये मटण विक्रेत्याकडे काम करणाºया तरुणाची हत्या, कोपरखैरणेतील फर्निचर व्यावसायिकाची हत्या, गोठीवली येथे पतीने केली पत्नीची हत्या, असे अनेक हत्येचे गुन्हे किरकोळ वादातून घडले आहेत.गोठीवली येथे घडलेला गुन्हा पती-पत्नीमधील सततच्या वादातून घडला होता. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा मनस्ताप असह्य झाल्याने पतीने तिची हत्या करून पळ काढला होता. हल्ली प्रत्येक जण नोकरी, व्यवसायातील स्पर्धेमुळे तणावग्रस्त जीवन जगत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा