शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

तिवरांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: April 9, 2016 02:25 IST

मुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे.

संजय करडे,  नांदगावमुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे. तालुक्याचा बहुतांशी भाग समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने समुद्राच्या भरती रेषेचे पाणी असंख्य शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने ही शेतजमीन नापीक होत आहे. शेतजमीन खारट झाल्याने येथील शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली, त्यामुळे अशा जमिनीत समुद्राचे पाणी शिरून कालांतराने तिवरांची संख्या वाढत आहे. यासाठी खार बंदिस्त बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. महसूल व वन मंत्रालयाने तिवरांच्या वृक्षांना विशेष संरक्षित केले आहे. तिवरांची झाडे तोडल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती परिमंडळ वन अधिकारी मुरुड विलास फंडे यांनी दिली. खारलँड विभागाकडून गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा खार बंदिस्त बंधारे निर्माण करता आलेले नाहीत. तसेच जे खार बंदिस्त बंधारे मोडकळीस आले अथवा नष्ट होत आहेत, त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात येत नसल्याने अमावस्या व पौर्णिमेच्या मोठ्या भरतीला या बंधाऱ्यावरून पाणी शेतात घुसून शेतजमीन नापीक होत आहे. यामुळे शेतकरी नाराज असून, खार बंदिस्त बंधारे बांधण्यात यावे अशी मागणी करीत आहेत. याबाबत अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच व शेतकरी मनोज कमाने म्हणाले, की अंबोली खारभूमीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे तो त्वरित दुरुस्त व्हावा, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही खार भूमी खात्याकडे एक वर्षापूर्वी दिले होते. परंतु या खात्याकडून कोणताच प्रतिसाद नाही. या बंधाऱ्यावरील समुद्राचे पाणी आत वा बाहेर जाण्यासाठी असणाऱ्या मोऱ्या खूप खराब व नादुरुस्त झाल्या होत्या. या विभागाचा कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने असंख्य शेतकरी एकवटून अखेर श्रमदानातून हे काम पूर्ण केले. ४० वर्षांपूर्वीचा हा बंधारा असून, पावसाळ्यापूर्वी जर हे काम पूर्ण झाले नाही तर समुद्राचे पाणी शेतात शिरून असंख्य एकर शेतजमीन नापीक होईल, अशी भीती कमाने यांनी व्यक्त केली. समुद्राचे पाणी शिरल्याने बहुतांशी शेतात आता तिवरांची संख्या वाढली आहे.वाढती लोकसंख्या व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मुले वेगळा संसार थाटून वेगळे घर बांधू इच्छितात. परंतु त्यांच्या मालकीच्या जमिनीत तिवर वाढल्याने तिथे घर बांधताना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वन खाते व महसूल खाते आडकाठी आणून काम थांबवतो. यामुळे वाढती तिवरांची संख्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.