शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

पनवेल परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ

By admin | Updated: May 26, 2016 02:58 IST

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत

पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत जवळपास १८ ठिकाणी घरफोड्यांचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरातील वाढत्या घरफोड्या व चोऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांची वाढती दहशत ही सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याची आहे. पोलिसांनी चोरट्यांचे आव्हान स्वीकारून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून चोऱ्या व घरफोड्यांना लगाम घालावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या, घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे सद्य:स्थितीवरून दिसत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवडाभरात आकुर्ली येथे ३ ठिकाणी, विचुंबे येथील प्रयाग सोसायटीमध्ये ९ ठिकाणी, आदई येथे सत्यज्योत, पुष्पविनायक, ओमकार ब्रम्हा अशा ५ ठिकाणी तसेच आकुर्ली मालेवाडी येथील आदिवासी मुलांच्या होस्टेलच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाइल, दप्तर चोरी करून नेले आहेत. त्यामुळे परिसरात घरफोड्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी लोकसंख्या जवळपास लाखाच्या घरात आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या आणि सोनसाखळी, वाहन चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. परिस्थितीवर देखरेख किंवा येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकसंख्या या परिसरात आसपास राहण्यासाठी आली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकापूर, आकुर्ली, विचुंबे आदी भागात जवळपास १८ हून अधिक घरफोड्यांचा प्रयत्न झाला आहे. मात्र केवळ २ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सभा घेणे गरजेचेदोन तीन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले होते. यावेळी खांदेश्वर पोलिसांनी शहरात नागरिकांना सावधानतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाळगण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मात्र घरफोड्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागल्याने अशा सभा पुन्हा घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.