शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

पनवेल परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ

By admin | Updated: May 26, 2016 02:58 IST

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत

पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत जवळपास १८ ठिकाणी घरफोड्यांचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरातील वाढत्या घरफोड्या व चोऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांची वाढती दहशत ही सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याची आहे. पोलिसांनी चोरट्यांचे आव्हान स्वीकारून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून चोऱ्या व घरफोड्यांना लगाम घालावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या, घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे सद्य:स्थितीवरून दिसत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवडाभरात आकुर्ली येथे ३ ठिकाणी, विचुंबे येथील प्रयाग सोसायटीमध्ये ९ ठिकाणी, आदई येथे सत्यज्योत, पुष्पविनायक, ओमकार ब्रम्हा अशा ५ ठिकाणी तसेच आकुर्ली मालेवाडी येथील आदिवासी मुलांच्या होस्टेलच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाइल, दप्तर चोरी करून नेले आहेत. त्यामुळे परिसरात घरफोड्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी लोकसंख्या जवळपास लाखाच्या घरात आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या आणि सोनसाखळी, वाहन चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. परिस्थितीवर देखरेख किंवा येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकसंख्या या परिसरात आसपास राहण्यासाठी आली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकापूर, आकुर्ली, विचुंबे आदी भागात जवळपास १८ हून अधिक घरफोड्यांचा प्रयत्न झाला आहे. मात्र केवळ २ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सभा घेणे गरजेचेदोन तीन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले होते. यावेळी खांदेश्वर पोलिसांनी शहरात नागरिकांना सावधानतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाळगण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मात्र घरफोड्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागल्याने अशा सभा पुन्हा घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.