शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

वर्षभरात स्मार्ट सिटीतील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:51 IST

स्मार्ट सिटीतल्या वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : स्मार्ट सिटीतल्या वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरासह आॅनलाइन फसवणुकीच्या घटना घडत असून, त्याद्वारे मानहानीसह वित्तहानी होत आहे; परंतु सायबर गुन्ह्यांच्या तपासाची स्वतंत्र सक्षम यंत्रणा पोलिसांकडे नसल्याने गतवर्षात तपासाचेही प्रमाण घसरले आहे.नवनवीन आयटी पार्क, आंतरराष्टÑीय विमानतळ याशिवाय जागतिक स्तरावर प्रसिद्ध कंपन्यांची कार्यालये यामुळे स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख देशपातळीवर होऊ लागली आहे; परंतु या स्मार्ट सिटीत सायबर गुन्हेगारांचे जाळे पसरत असून, ते मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. इंटरनेटचा वापर करताना पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याने सायबर गुन्हेगारांना गुन्ह्यासाठी मोकळा मार्ग मिळत आहे. परिणामी, देशाबाहेरील अथवा शहरातच लपलेली अज्ञात व्यक्ती एखाद्याला सहन आॅनलाइन गंडा घालत आहे. अशा ६२ गुन्ह्यांची नोंद गतवर्षात नवी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे झालेली आहे. त्यामध्ये तब्बल दोन कोटी ४२ लाख ४२ हजार ९१७ रुपयांची फसवणूक झालेली आहे. त्यात फेसबुकवरील मैत्रीचा फायदा घेऊन ८५ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा गंडा संबंधितांना घालण्यात आलेला आहे. तर आॅनलाइन फसवणुकीतून २१ लाख ३६ हजार ७७२ रुपये लुटण्यात आले आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या स्वरूपाच्या तब्बल ४१७ तक्रारी गतवर्षात सायबर सेलकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यातही सर्वाधिक तक्रारी आॅनलाइन फसवणूक व सोशल मीडियाद्वारे झालेल्या फसवणुकींचा समावेश आहे. मात्र, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये या तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रमाण घसरले आहे.२०१८ मध्ये सायबर सेलकडे १२० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात सोशल मीडियावरील फसवणुकीच्या ४६ तर आॅनलाइन फसवणुकीच्या ४९ तक्रारी होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात तत्कालीन तपास अधिकाऱ्यांना यश आलेले आहे. मात्र, गतवर्षात या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. एकूण ४१७ तक्रारीमध्ये आॅनलाइन फसवणुकीच्या १६७ तर सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या ९७ तक्रारी आहेत. त्यापैकी सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या ८६ व आॅनलाइन फसवणुकीच्या १४८ तक्रारींचा निपटारा झाला असून उर्वरित प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. तर वर्षभरात ४१७ पैकी ३५४ तक्रारींचा उलगडा होऊ शकलेला आहे. २०१८ च्या तुलनेत गतवर्षातील तपासाचे हे प्रमाण कमी आहे. परिणामी, स्मार्ट सिटीपुढे भविष्यातील गुन्हेगारीचे आव्हान पेलण्यास पोलीस अद्यापही सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. तर तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक संगिता अल्फान्सो, प्रतिभा शेडगे यांच्यानंतर सायबर सेलला तज्ज्ञ अधिकारी मिळालेला नसल्यानेही तपासावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची कमतरतानवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपावरून येत्या काळात पोलिसांपुढे सायबर गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिसांनाही तंत्रज्ञान अद्ययावत होऊन सायबर सेल सक्षम करण्याची गरज भासत आहे. त्याकरिता नवी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे तयार करण्याचीही गरज आहे. तसे झाल्यास तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत सायबर गुन्ह्यांचा जलदगतीने निपटारा होऊ शकतो; परंतु सध्या स्थानिक पोलीस ठाण्यातच सायबर गुन्ह्यांची नोंद केली जात असून, त्याच्या तपासाकरिता सायबर सेलची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई