शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ऐन पावसाळ्याच्या मध्यावर तुर्भेत पाणी टंचाई; शिवसेनेचा हांडा मोर्चा 

By नामदेव मोरे | Updated: August 18, 2023 12:06 IST

तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई: नवी मुंबईतील इंदिरानगर व इतर झोपडपट्टी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महानगर पालिका विभाग कार्यालयावर हांडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध  केला.

 तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळ दोन - दोन दिवस पाणी येत नाही. रात्री अपरात्री पाणी येत असल्यामुळेही नागरिकांची गैरसोय होत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण आहे. नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा महानगरपालिका करत आहे. परंतु इंदिरानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न साेडविण्यासाठी १८ ऑगस्टला हंडा  मोर्चा काढला.

  सिडको विकसीत नोडप्रमाणे सकाळी व सायंकाळी नियमीत वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा.  इंदिरानगर झोपडपट्टीलाही एमआयडीसीऐवजी मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आवश्यक जलकुंभ, जलवाहिन्या टाकण्यात याव्यात अशा मागण्या केल्या.  यावेळेस जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपशहरप्रमुख महेश कोठीवाले, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर,सिद्धाराम शिलवंत यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपात