शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

ऐन पावसाळ्याच्या मध्यावर तुर्भेत पाणी टंचाई; शिवसेनेचा हांडा मोर्चा 

By नामदेव मोरे | Updated: August 18, 2023 12:06 IST

तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई: नवी मुंबईतील इंदिरानगर व इतर झोपडपट्टी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महानगर पालिका विभाग कार्यालयावर हांडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध  केला.

 तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळ दोन - दोन दिवस पाणी येत नाही. रात्री अपरात्री पाणी येत असल्यामुळेही नागरिकांची गैरसोय होत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण आहे. नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा महानगरपालिका करत आहे. परंतु इंदिरानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न साेडविण्यासाठी १८ ऑगस्टला हंडा  मोर्चा काढला.

  सिडको विकसीत नोडप्रमाणे सकाळी व सायंकाळी नियमीत वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा.  इंदिरानगर झोपडपट्टीलाही एमआयडीसीऐवजी मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आवश्यक जलकुंभ, जलवाहिन्या टाकण्यात याव्यात अशा मागण्या केल्या.  यावेळेस जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपशहरप्रमुख महेश कोठीवाले, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर,सिद्धाराम शिलवंत यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपात