शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मागील ३४ वर्षात जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त उपाशी अशी विदारक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 12:39 IST

जेएनपीटीने शुक्रवारी (२६) ३४ वर्षं पूर्ण केली आहेत.या ३४ वर्षातील लेखाजोखा पाहता जेएनपीएने मात्र प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावरच सोडले आहे.

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीटीने शुक्रवारी (२६) ३४ वर्षं पूर्ण केली आहेत.या ३४ वर्षातील लेखाजोखा पाहता जेएनपीएने मात्र प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावरच सोडले आहे.ना नोकऱ्या, साडेबारा टक्के भूखंडांचा अद्यापही पत्ता नाही, विस्थापित दोन्ही गावे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.तर शेकडो प्रकल्पग्रस्त वय उलटून गेल्यानंतरही नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत.त्यामुळे ३४ वर्षांनंतर जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त शेतकरी उपाशी अशी विदारक स्थिती सध्या पाहायला मिळते आहे.

 जेएनपीटीने आज ३५ व्या  वर्षात पदार्पण केले आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या निमित्ताने मुंबईच्या अलिशान पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून खास जंगी सेलिब्रेशनही केले.मात्र मागील ३४ वर्षात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथोरिटी शिवाय काही एक बदल झालेला नाही.बंदर उभारण्यासाठी येथील तीन हजार खातेदार शेतकऱ्यांकडून सुमारे ३००० हेक्टर जमीन संपादन करुन जेएनपीए आता देशातील पहिली लॅण्डलोड पोर्ट (जमिनीचा मालक) बनली आहे.

वार्षिक ९०० कोटींहून अधिक नफा कमावणाऱ्या जेएनपीएने  पाचही बंदरे खाजगीकरणातुन बहुराष्ट्रीय कंपन्यांना ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देऊन दुकानदारी सुरू केली आहे. रॉयल्टीच्या दुकानदारीतुन मिळणाऱ्या कोट्यावधीं रुपयांच्या बक्कळ नफ्यामुळे जेएनपीएचे डोळे चांगलेच पांढरे झाले आहेत.त्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचा विसर पडला असल्याचा घणाघाती आरोप न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सेक्रेटरी तथा माजी कामगार ट्र्स्टी भुषण पाटील यांनी केला आहे.

जेएनपीए अंतर्गत खासगी पाच बंदरे आली आहेत. मात्र जेएनपीएसह पाचही खासगी बंदरातही प्रतिक्षेत असलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांना परप्रांतीय कामगारांची भरती करण्यात आली आहे.देशातील सर्वात मोठा सेझ म्हणून गाजावाजा करण्यात आलेल्या या सेझमध्ये दिड लाख रोजगार उपलब्ध होतील अशी ग्वाही दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनप्रसंगी दिली होती.मात्र सध्या जेएनपीए सेझमध्ये फक्त ३० फायरमनची भरती करण्यात आली आहे.साडेबारा टक्के विकसित भुखंडाचा वाटपाची अद्याप ३००० खातेदार व त्यांच्या १२००० लाभार्थीचा प्रश्न अद्यापही जेएनपीएला सोडविता आलेला नाही.

हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा या दोन्ही विस्थापित गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी लोंबकळत आहे.३४ वर्षात १८ जेएनपीए प्रकल्पग्रस्त गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात जेएनपीए सपशेल अपयशी ठरली आहे.त्यामुळे जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त उपाशी अशी विदारक स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सेक्रेटरी तथा माजी कामगार ट्र्स्टी भुषण पाटील यांनी दिली.