शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

मागील ३४ वर्षात जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त उपाशी अशी विदारक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 12:39 IST

जेएनपीटीने शुक्रवारी (२६) ३४ वर्षं पूर्ण केली आहेत.या ३४ वर्षातील लेखाजोखा पाहता जेएनपीएने मात्र प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावरच सोडले आहे.

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीटीने शुक्रवारी (२६) ३४ वर्षं पूर्ण केली आहेत.या ३४ वर्षातील लेखाजोखा पाहता जेएनपीएने मात्र प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावरच सोडले आहे.ना नोकऱ्या, साडेबारा टक्के भूखंडांचा अद्यापही पत्ता नाही, विस्थापित दोन्ही गावे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.तर शेकडो प्रकल्पग्रस्त वय उलटून गेल्यानंतरही नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत.त्यामुळे ३४ वर्षांनंतर जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त शेतकरी उपाशी अशी विदारक स्थिती सध्या पाहायला मिळते आहे.

 जेएनपीटीने आज ३५ व्या  वर्षात पदार्पण केले आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या निमित्ताने मुंबईच्या अलिशान पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून खास जंगी सेलिब्रेशनही केले.मात्र मागील ३४ वर्षात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथोरिटी शिवाय काही एक बदल झालेला नाही.बंदर उभारण्यासाठी येथील तीन हजार खातेदार शेतकऱ्यांकडून सुमारे ३००० हेक्टर जमीन संपादन करुन जेएनपीए आता देशातील पहिली लॅण्डलोड पोर्ट (जमिनीचा मालक) बनली आहे.

वार्षिक ९०० कोटींहून अधिक नफा कमावणाऱ्या जेएनपीएने  पाचही बंदरे खाजगीकरणातुन बहुराष्ट्रीय कंपन्यांना ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देऊन दुकानदारी सुरू केली आहे. रॉयल्टीच्या दुकानदारीतुन मिळणाऱ्या कोट्यावधीं रुपयांच्या बक्कळ नफ्यामुळे जेएनपीएचे डोळे चांगलेच पांढरे झाले आहेत.त्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचा विसर पडला असल्याचा घणाघाती आरोप न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सेक्रेटरी तथा माजी कामगार ट्र्स्टी भुषण पाटील यांनी केला आहे.

जेएनपीए अंतर्गत खासगी पाच बंदरे आली आहेत. मात्र जेएनपीएसह पाचही खासगी बंदरातही प्रतिक्षेत असलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांना परप्रांतीय कामगारांची भरती करण्यात आली आहे.देशातील सर्वात मोठा सेझ म्हणून गाजावाजा करण्यात आलेल्या या सेझमध्ये दिड लाख रोजगार उपलब्ध होतील अशी ग्वाही दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनप्रसंगी दिली होती.मात्र सध्या जेएनपीए सेझमध्ये फक्त ३० फायरमनची भरती करण्यात आली आहे.साडेबारा टक्के विकसित भुखंडाचा वाटपाची अद्याप ३००० खातेदार व त्यांच्या १२००० लाभार्थीचा प्रश्न अद्यापही जेएनपीएला सोडविता आलेला नाही.

हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा या दोन्ही विस्थापित गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी लोंबकळत आहे.३४ वर्षात १८ जेएनपीए प्रकल्पग्रस्त गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात जेएनपीए सपशेल अपयशी ठरली आहे.त्यामुळे जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त उपाशी अशी विदारक स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सेक्रेटरी तथा माजी कामगार ट्र्स्टी भुषण पाटील यांनी दिली.