शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हापूसची विक्री डझनमध्ये; भाव किलोच्या दरात, नागरिकांमध्ये संभ्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:26 IST

बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. 

बाजार समितीत शुक्रवारी  ५०,४९९ पेट्यांची आवक झाली. यामध्ये ३९,१६५ पेट्या हापूसचा समावेश आहे. उर्वरित आवक इतर राज्यांमधून झाली आहे. हापूस आंब्याची विक्री डझनच्या प्रमाणात केली जाते; परंतु बाजार समिती प्रशासन त्यांच्या अभिलेखावर प्रतिकिलोप्रमाणे बाजारभावाची नोंद करीत आहे. 

बाजारभाव अद्ययावत करावेत -

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती रोज शासनाला  आवक व बाजारभावाची माहिती देते; परंतु काळीवेळा अनेक महिन्यांपासून बाजारभावात काहीच फरक दिसत नाही. अनेक महिने दर स्थिर कसे राहतात, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला असून बाजारभाव रोज अद्ययावत व वस्तुस्थितीप्रमाणे द्यावेत, अशीही मागणी केली जात आहे. शेतकरीही संभ्रमात -

शासनाला पाठविण्यात येणाऱ्या दरतक्त्यामध्येही किलोप्रमाणे भाव दिले जात आहेत. विक्री डझनप्रमाणे व भाव किलोच्या दरात या फरकामुळे ग्राहकांचा व शेतकऱ्यांचाही गोंधळ होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये हापूसला नक्की किती भाव मिळतो, याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. खरेदीदारांचीही दिशाभूल होत आहे.  

१) बाजार समिती प्रशासनाने हापूसचे दर डझनप्रमाणे प्रसारित करावेत व इतर आंब्यांचे दर किलोप्रमाणे प्रसारित करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

२) नेरूळमधील सामाजिक कार्यकर्ते सचिव पवार यांनीही याविषयी बाजार समिती प्रशासनाकडे मागणी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती