शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीदरामध्ये सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:15 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीदरामध्ये सुधारणा केली जाणार आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीदरामध्ये सुधारणा केली जाणार आहे. फ्लॅटरेटधारकांप्रमाणे गावठाण, झोपडपट्टी व सर्व प्रकारच्या मीटरधारकांना ५० रुपयांमध्ये ३0 हजार लिटर पाणी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे पाणीपुरवठ्यासाठीचा खर्च व उत्पन्न यामध्ये मोठी तफावत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने फेब्रुवारी २०१० मध्ये वैयक्तिक मीटर असलेल्या ग्राहकांना ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु प्रत्यक्षात वैयक्तिक मीटरधारकांची संख्या कमी असल्यामुळे या योजनेचा लाभ बहुसंख्य नागरिकांना झालाच नाही. गृहनिर्माण सोसायटी, गावठाण व झोपडपट्टीमधील नागरिकांना याचा काहीही उपयोग झाला नाही. हा ठराव मंजूर करताना व त्यानंतरही गृहनिर्माण सोसायटीसाठीही ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्यात यावे अशाप्रकारे उपसूचना मांडल्या होत्या. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पाणी दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पूर्वीच्या फ्लॅटरेटधारकांप्रमाणे सर्व मीटरधारकांना ५० रुपयांमध्ये पाणी द्यावे. शाळा, कॉलेज, धर्मादाय नोंदणीकृत संस्था, शिक्षण मंडळे यांना प्रस्तावित ११ रुपयेऐवजी ४.७५ प्रमाणे दर आकारण्यात यावा. विनाजलमापक ग्राहकांना १८३० रुपये महिनाऐवजी १ हजार रुपये दर प्रस्तावित केले आहेत. बांधकाम प्रमाणपत्र असलेल्या व भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या मात्र रहिवासी वापर सुरू असलेल्या इमारतधारकांनी एक वर्षापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र सादर न केल्यास एक वर्षानंतर प्रस्तावित १५ रुपयेऐवजी ७.५० रुपयेप्रमाणे दर आकारणी करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे.महापालिकेने ५ मार्चला आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. वास्तविक २०१० मध्ये स्वस्त दरात पाणी देण्याचा ठराव मंजूर केला होता. तेव्हापासून या योजनेचा वर्षनिहाय नक्की किती नागरिकांना लाभ झाला याचा आढावा घेण्यात आला नाही. तेव्हा मांडलेल्या उपसूचनांची अंमलबजावणी का झाली नाही याचीही विचारणा केलेली नाही. निवडणुका जवळ आल्या असताना शहरवासीयांना खूश करण्यासाठी स्वस्त पाणी योजनेचे प्रलोभन दाखविले जात असल्याची चर्चा आहे.>उत्पन्नावर होत आहे परिणामजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थापन प्रकल्पाच्या अहवालातील अनिवार्य सुधारणानुसार व शासन निर्णयाप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचा खर्च पाणीबिलामधून मिळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीवर १०८ कोटी २३ लाख रुपये खर्च होत असून पाणी देयकातून फक्त ८० कोटी ७० लाख रुपये जमा होत आहेत. सद्यस्थितीमध्ये २७ कोटी ५३ लाख रुपये तूट असून सुधारित प्रस्तावामुळे ही तूट अजून वाढत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणी