शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाने अडवणूक केल्यास काम करणे अशक्य - शहर अभियंत्यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:22 IST

प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यास तो जरूर थांबवावा, परंतु विनाकारण प्रस्ताव अडविल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यास तो जरूर थांबवावा, परंतु विनाकारण प्रस्ताव अडविल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. सभागृहानेच अशाप्रकारे अडवणूक केल्यास अधिकाºयांना काम करणे अशक्य होणार असल्याचे स्पष्ट मत शहर अभियंता मोहन डगावकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या सूचक वक्तव्यातून पालिकेत सर्व काही आलबेल नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.शहर अभियंता मोहन डगावकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावावर माहिती देताना अडवणुकीमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. प्रस्तावामध्ये एखादी त्रुटी असल्यास तो जरूर थांबवावा, परंतु विनाकारण प्रस्ताव स्थगित केल्याने भविष्यात पुढाकार घेवून काम करण्यास कोणीही तयार होणार नाही. अनेक वेळा आम्ही ठेकेदारांकडून कामे करून घेतो. पण आमच्या मतांना महत्त्व दिले जाणार नसेल तर आमचेही कोणी ऐकणार नाही. कामे करून घेणे अवघड जाईल असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. शहर अभियंत्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे स्थायी समिती चकीत झाली. वास्तविक घनकचरा विभागाच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली असली तरी त्यामागे खूप गंभीर अर्थ असल्याचे बोलले जात आहे. मागील काही स्थायी समिती बैठकीमध्ये अनेक प्रस्ताव स्थगित केले जात आहेत. विकासकामांचेही राजकारण होवू लागले आहे. ऐरोली परिसरामध्ये जलउदंचन केंद्र चालविणाºया ठेकेदाराविषयी प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव सभागृहाने फेटाळून लावला. यामुळे अडचणीच्या काळामध्ये पालिकेला मदत करणाºया ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले होते. पाणीपुरवठ्याचे काम सुरळीत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. याशिवाय शहरात चार ठिकाणी होर्डिंग लावण्याचा प्रस्तावही स्थायी समितीने थांबविला होता.राजकीय कुरघोडी करण्याची स्पर्धा लोकप्रतिनिधींमध्ये सुरू आहे. अधिकाºयांमध्येही प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कायम सेवेत असलेले अधिकारी यांच्यामध्ये योग्य संवाद होत नाही. अधिकारीच एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. आयुक्तांनाही अद्याप अधिकाºयांमधील दरी दूर करण्यात यश आलेले नाही. महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधींचीही ठोस भूमिका राहिलेली नाही. एकूणच अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाºयांमधील ताण वाढू लागला आहे. खाजगीमध्ये चर्चा करताना अधिकाºयांमधील नैराश्याची भावना स्पष्टपणे दिसू लागली आहे. काहीतरी चांगले काम करायची इच्छाच राहिलेली नाही. काम करणाºयांना प्रोत्साहन मिळत नाही.अधिकाºयांमध्येच गटबाजी व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींचा दबाव. माहिती अधिकार कार्यकर्ते, सत्ताबाह्य केंद्र या सर्वांमध्ये अधिकारी व कर्मचारी भरडले जात आहेत. कामे करायला गेले की अडवणूक होते. कामे केली नाही की धारेवर धरले जाते. यामुळे नक्की करायचे काय असा प्रश्न वरिष्ठ अधिकारीच बोलू लागले असून त्या सर्वांचीच भूमिका शहर अभियंत्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखविल्याची चर्चा महापालिकेमध्ये सुरू झाली आहे.अधिकाºयांना प्रोत्साहनच नाहीमहापालिकेमधील अधिकारी व कर्मचाºयांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. चांगले काम करण्याची भावना कोणामध्येच राहिलेली नाही. जे अधिकारी भेटतील हतबलता व्यक्त करू लागले आहेत. कामे करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. प्रस्ताव तयार करण्यापासून बिले देण्यापर्यंत अडचणींचा पाढाच वाचला जात आहे. अधिकाºयांना प्रोत्साहनच मिळत नसून त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण केले जात असून त्याचा परिणाम कामावर होत आहे.राजीनामे द्यायची इच्छाअनेक अधिकाºयांनी काम करण्यामध्ये स्वारस्य राहिलेले नाही. राजीनामा देवून पालिकेच्या सेवेतून मुक्त व्हावे असे वाटू लागले असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. परंतु राजीनामा दिला तर काहीतरी घोटाळा केला असेल असा संशय व्यक्त करण्याच्या भीतीने फक्त दिवस ढकलण्याचे काम सुरू असल्याचे मत काही अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.दरी कमी करण्याचे आव्हानमहापालिकेमधील प्रतिनियुक्तीवरील व कायम सेवेत असलेल्या अधिकाºयांमधील दरी कमी करण्याचे आव्हान आयुक्त रामास्वामी एन. व लोकप्रतिनिधींपुढे आहे. प्रत्येक अधिकाºयाच्या मनामध्ये नक्की नैराश्य कशामुळे आले आहे, काम करण्यामध्ये आनंद का मिळत नाही, दबावाखाली अधिकारी, कर्मचारी का काम करत आहेत याविषयी संवाद साधून योग्य मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांसमोर उभे राहिले आहे.