शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

यादवनगरमध्ये अतिक्रमणाचे साम्राज्य

By admin | Updated: April 19, 2016 02:39 IST

औद्योगिक वसाहतीमधील यादवनगर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. उद्योगासाठी राखीव असलेली जवळपास ५० एकर जमीन परप्रांतीयांनी बळकावली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबई औद्योगिक वसाहतीमधील यादवनगर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. उद्योगासाठी राखीव असलेली जवळपास ५० एकर जमीन परप्रांतीयांनी बळकावली आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे तोडणारे एमआयडीसी, सिडको व पालिका प्रशासनाने परप्रांतीयांच्या अतिक्रमणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, व्होटबँकेसाठी त्यांना राजकीय वरदहस्त मिळू लागला आहे. महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीमुळे पूर्ण शहराचे लक्ष यादवनगरवर केंद्रित झाले होते. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्यांचा परिसर या प्रभागात येतो. निवडणूक लागल्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते येथे तळ ठोकून बसले होते. रामअशिष यादव यांचा बालेकिल्ला असणाऱ्या या परिसरामधील अतिक्रमण पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जवळपास ५० एकर जमिनीवर वसाहत उभारण्यात आली आहे. फक्त रहिवासी संकुलच नाही तर दुकाने, तबेले, लघू उद्योग व इतर अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. उद्योगासाठी असलेली जागा बळकावल्यानंतर आता हायटेन्शन व वन विभागाच्या जागेवरही अतिक्रमण सुरू झाले आहे. यादव साम्राज्य म्हणून हा परिसर ओळखला जाऊ लागला आहे. जवळपास ५ हजार झोपड्या येथे झाल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जवळपास ९० टक्के परप्रांतीयांचा समावेश आहे. येथे पालिका व एमआयडीसीचे नियम लागू होत नाहीत. कोणतीही परवानगी न घेता येथे बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. करोडो रुपयांच्या जमिनीवर गोडाऊन उभारली आहेत. प्रत्येक वर्षी शेकडो झोपड्या उभारल्या आहेत. वसाहतीमध्ये जिथे जागा मिळेल तेथे तत्काळ झोपडी उभारली जात आहे. रोडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात भंगार खेरदी-विक्रीची गोडाऊन उभी केली आहेत. एमआयडीसी मुख्य रोडच्या बाजूचे अतिक्रमण हटविते, परंतु यादवनगरचे साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात अजिबात कारवाई होत नाही. यादवनगरमध्ये जवळपास ५० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहेत. मागील बाजूला असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी झोपड्या उभारण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडे जवळपास २००० हजार पासूनचे गुगल मॅप उपलब्ध आहेत. गुगल मॅप पाहिले तरी गत १५ वर्षांमध्ये किती अतिक्रमण झाले, हे स्पष्ट होऊ शकते. परंतु कारवाई करण्यास राजकीय अडथळे येत असल्याने प्रशासन तेथे कारवाईच करीत नाही. शहरामध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पाडली जातात. प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरविण्याची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे परप्रांतीयांनी बिनधास्तपणे जागा हडप केल्यानंतरही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.