शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

यादवनगरमध्ये अतिक्रमणाचे साम्राज्य

By admin | Updated: April 19, 2016 02:39 IST

औद्योगिक वसाहतीमधील यादवनगर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. उद्योगासाठी राखीव असलेली जवळपास ५० एकर जमीन परप्रांतीयांनी बळकावली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबई औद्योगिक वसाहतीमधील यादवनगर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. उद्योगासाठी राखीव असलेली जवळपास ५० एकर जमीन परप्रांतीयांनी बळकावली आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे तोडणारे एमआयडीसी, सिडको व पालिका प्रशासनाने परप्रांतीयांच्या अतिक्रमणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, व्होटबँकेसाठी त्यांना राजकीय वरदहस्त मिळू लागला आहे. महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीमुळे पूर्ण शहराचे लक्ष यादवनगरवर केंद्रित झाले होते. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्यांचा परिसर या प्रभागात येतो. निवडणूक लागल्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते येथे तळ ठोकून बसले होते. रामअशिष यादव यांचा बालेकिल्ला असणाऱ्या या परिसरामधील अतिक्रमण पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जवळपास ५० एकर जमिनीवर वसाहत उभारण्यात आली आहे. फक्त रहिवासी संकुलच नाही तर दुकाने, तबेले, लघू उद्योग व इतर अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. उद्योगासाठी असलेली जागा बळकावल्यानंतर आता हायटेन्शन व वन विभागाच्या जागेवरही अतिक्रमण सुरू झाले आहे. यादव साम्राज्य म्हणून हा परिसर ओळखला जाऊ लागला आहे. जवळपास ५ हजार झोपड्या येथे झाल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जवळपास ९० टक्के परप्रांतीयांचा समावेश आहे. येथे पालिका व एमआयडीसीचे नियम लागू होत नाहीत. कोणतीही परवानगी न घेता येथे बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. करोडो रुपयांच्या जमिनीवर गोडाऊन उभारली आहेत. प्रत्येक वर्षी शेकडो झोपड्या उभारल्या आहेत. वसाहतीमध्ये जिथे जागा मिळेल तेथे तत्काळ झोपडी उभारली जात आहे. रोडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात भंगार खेरदी-विक्रीची गोडाऊन उभी केली आहेत. एमआयडीसी मुख्य रोडच्या बाजूचे अतिक्रमण हटविते, परंतु यादवनगरचे साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात अजिबात कारवाई होत नाही. यादवनगरमध्ये जवळपास ५० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहेत. मागील बाजूला असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी झोपड्या उभारण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडे जवळपास २००० हजार पासूनचे गुगल मॅप उपलब्ध आहेत. गुगल मॅप पाहिले तरी गत १५ वर्षांमध्ये किती अतिक्रमण झाले, हे स्पष्ट होऊ शकते. परंतु कारवाई करण्यास राजकीय अडथळे येत असल्याने प्रशासन तेथे कारवाईच करीत नाही. शहरामध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पाडली जातात. प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरविण्याची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे परप्रांतीयांनी बिनधास्तपणे जागा हडप केल्यानंतरही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.