शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 00:55 IST

शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत.

नवी मुंबई : शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची जादा आर्थिक लूट देखील होत असून यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.नवी मुंबई शहरात राज्यातील विविध भागातील नागरिक वास्तव्य करीत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून लग्नसराई देखील सुरु आहे. त्यानिमित्ताने गावी ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. एसटी बसचे आरक्षण देखील फुल्ल असल्याने नागरिकांना महामार्गावरील बस थांब्यांवर जाऊन मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. नवी मुंबई शहरात ठाणे-बेलापूर आणि सायन- पनवेल महामार्गावर एसटी बसचे थांबे आहेत. सायन- पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरु ळ, बेलापूर, खारघर, कळंबोली, खांदा वसाहत आणि पनवेल आदी बस स्टॉपवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. खाजगी वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत असून प्रवासी घेण्यासाठी बसस्टॉपवर गर्दी करीत आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. भाजीपाला, दूध आदी मालवाहतूक करणारे ट्रक, टेंपो चालक देखील या गर्दीचा फायदा घेऊन पुणे, चाकण, राजगुरूनगर, नारायणगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी भागातील प्रवासी घेण्यासाठी बस स्टॉपवर थांबत आहेत.टेंपोसारख्या वाहनांमध्ये चालकाच्या केबिनमध्ये तसेच मागील बाजूस प्रवासी बसवून त्यांची वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांकडून एसटीच्या प्रवास भाड्यापेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत. ट्रॅव्हल्स बस, कार, जीपसारखे वाहनचालक देखील या प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेत असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असून मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. प्रवासी घेण्यासाठी अवैध वाहतूक करणारी लहान-मोठी सर्व वाहने बस स्टॉपवर उभी केली जात असल्याने इतर वाहनांना तसेच एसटी बसला अडथळा निर्माण होत असून वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई