शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 00:55 IST

शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत.

नवी मुंबई : शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची जादा आर्थिक लूट देखील होत असून यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.नवी मुंबई शहरात राज्यातील विविध भागातील नागरिक वास्तव्य करीत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून लग्नसराई देखील सुरु आहे. त्यानिमित्ताने गावी ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. एसटी बसचे आरक्षण देखील फुल्ल असल्याने नागरिकांना महामार्गावरील बस थांब्यांवर जाऊन मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. नवी मुंबई शहरात ठाणे-बेलापूर आणि सायन- पनवेल महामार्गावर एसटी बसचे थांबे आहेत. सायन- पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरु ळ, बेलापूर, खारघर, कळंबोली, खांदा वसाहत आणि पनवेल आदी बस स्टॉपवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. खाजगी वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत असून प्रवासी घेण्यासाठी बसस्टॉपवर गर्दी करीत आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. भाजीपाला, दूध आदी मालवाहतूक करणारे ट्रक, टेंपो चालक देखील या गर्दीचा फायदा घेऊन पुणे, चाकण, राजगुरूनगर, नारायणगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी भागातील प्रवासी घेण्यासाठी बस स्टॉपवर थांबत आहेत.टेंपोसारख्या वाहनांमध्ये चालकाच्या केबिनमध्ये तसेच मागील बाजूस प्रवासी बसवून त्यांची वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांकडून एसटीच्या प्रवास भाड्यापेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत. ट्रॅव्हल्स बस, कार, जीपसारखे वाहनचालक देखील या प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेत असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असून मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. प्रवासी घेण्यासाठी अवैध वाहतूक करणारी लहान-मोठी सर्व वाहने बस स्टॉपवर उभी केली जात असल्याने इतर वाहनांना तसेच एसटी बसला अडथळा निर्माण होत असून वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई