शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

ठाणे-बेलापूर मार्गावर अवैध पार्किंगचे पेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:29 IST

ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे

नवी मुंबई : ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे. कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाºया बस रस्त्यालगत उभ्या केल्या जात आहेत, यामुळे अपघाताची शक्यता असतानाही वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीत कमालीची वाढ झाली आहे. त्यात जड, अवजड वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. यामुळे जागोजागी वाहतूककोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास ऐरोलीकरांना सहन करावा लागत आहे. या त्रासातून ऐरोलीकरांची अद्याप महिनाभर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत, यामुळे वाहतूककोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानंतरही ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावरील खासगी कंपन्यांची अवैध पार्किंग हटवण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्या ठिकाणी दोन्ही दिशेच्या मार्गालगत खासगी कंपन्यांच्या बस उभ्या केल्या जात आहेत. तर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगच्या जागेतही बस उभ्या केल्या जात आहेत. यावरून परिसरातील खासगी कंपन्यांच्या बस पार्किंगसाठी रस्ते व रेल्वेस्थानकाची जागा प्रशासनाने आंदण दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे व कोपरखैरणे परिसरातही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.नोकरी-व्यवसायानिमित्ताने नवी मुंबईत येणाºया कामगार वर्गाची संख्या मोठी आहे, यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळी ठाणे-बेलापूर मार्गावर रहदारी वाढलेली असते. अशा वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या खासगी कंपन्यांच्या बस व कार यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्या ठिकाणी अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खासगी कंपन्यांच्या ताब्यातून ठाणे-बेलापूर मार्गाची सुटका करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु सर्वसामान्यांच्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणारे वाहतूक पोलीस खासगी कंपन्यांच्या बसवर का कारवाई करत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंगroad transportरस्ते वाहतूक