शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ठाणे-बेलापूर मार्गावर अवैध पार्किंगचे पेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:29 IST

ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे

नवी मुंबई : ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे. कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाºया बस रस्त्यालगत उभ्या केल्या जात आहेत, यामुळे अपघाताची शक्यता असतानाही वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीत कमालीची वाढ झाली आहे. त्यात जड, अवजड वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. यामुळे जागोजागी वाहतूककोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास ऐरोलीकरांना सहन करावा लागत आहे. या त्रासातून ऐरोलीकरांची अद्याप महिनाभर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत, यामुळे वाहतूककोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानंतरही ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावरील खासगी कंपन्यांची अवैध पार्किंग हटवण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्या ठिकाणी दोन्ही दिशेच्या मार्गालगत खासगी कंपन्यांच्या बस उभ्या केल्या जात आहेत. तर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगच्या जागेतही बस उभ्या केल्या जात आहेत. यावरून परिसरातील खासगी कंपन्यांच्या बस पार्किंगसाठी रस्ते व रेल्वेस्थानकाची जागा प्रशासनाने आंदण दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे व कोपरखैरणे परिसरातही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.नोकरी-व्यवसायानिमित्ताने नवी मुंबईत येणाºया कामगार वर्गाची संख्या मोठी आहे, यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळी ठाणे-बेलापूर मार्गावर रहदारी वाढलेली असते. अशा वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या खासगी कंपन्यांच्या बस व कार यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्या ठिकाणी अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खासगी कंपन्यांच्या ताब्यातून ठाणे-बेलापूर मार्गाची सुटका करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु सर्वसामान्यांच्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणारे वाहतूक पोलीस खासगी कंपन्यांच्या बसवर का कारवाई करत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंगroad transportरस्ते वाहतूक