शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी मार्केटमध्ये अवैध कारखाने

By admin | Updated: November 12, 2015 02:07 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम

नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम फोडण्याच्या कारखान्याचे बिंग उघडकीस आले आहे. महापालिकेची व एपीएमसीची परवानगी न घेताच या ठिकाणी कारखाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आशिया खंडामधील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत. अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी रात्री मसाला मार्केटच्या जी ३६ या गाळाला आग लागली. आगीमध्ये फारसे नुकसान झाले नसले, तरी या गाळ्यात बेकायदेशीर व्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्केटमध्ये फक्त गोडाउनमध्ये माल ठेवता येतो. पोटमाळ्यावर व्यापाऱ्यांचे कर्मचारी, हिशेब वह्या यासाठी पेढी तयार करून दिली आहे, परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी चक्क दोन मजले बांधकाम केले आहे. आग लागलेल्या गाळ्यामध्येही गोडाउनच्या वर दोन पोटमाळे तयार केले होते. गोडाउनमध्ये बदाम फोडण्याचे एक व छतावर तीन मशीन ठेवण्यात आल्या आहेत. वास्तविक, शहरात धान्य दळण्याची चक्की सुरू करायची असली, तरी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. बाजारसमितीमध्ये बदाम फोडण्याचा कारखाना सुरू असून, त्यासाठी कोणतीच परवानगी घेतलेली नाही. ज्या गाळ्याच्या छतावर आग लागली, त्या व्यापाऱ्याने अनधिकृतपणे लाकडी शेडही बांधली होती. ती शेड पूर्णपणे जळूून गेली आहे. शेजारच्या चार गाळ्यांवरील शेडही जळाली आहे. सर्वच व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व एपीएमसीची परवानगी न घेता, शेड टाकली आहेत. पोटमाळ्यावर बदाम निवडण्याचे काम केले जात आहे. गोडाउनमध्ये अत्यंत दाटीवाटीने माल ठेवण्यात आला आहे. आग लागली, तर ती विझविण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नव्हती. बाजारसमितीमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अनेक ठिकाणी बदाम फोडण्याचे कारखाने विनापरवाना सुरू आहेत, परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. बाजारसमिती प्रशासनाने पूर्ण मार्केटचे सर्वेक्षण करून अतिक्रमण करणाऱ्या व बेकायदेशीरपणे गाळ्यांमध्ये कारखाना सुरू करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व संबंधितांवर मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली जात आहे. महापालिकेने ही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.