शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आद्यक्रांतिकारकांचे स्मारकही दुर्लक्षितच, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, शिरढोणमधील हुतात्मा स्मारकाचीही दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 02:55 IST

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे पुरातत्त्व विभागाने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. वाडा उभारला; परंतु आतमधील साहित्य व तैलचित्रांचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई : आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे पुरातत्त्व विभागाने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. वाडा उभारला; परंतु आतमधील साहित्य व तैलचित्रांचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. स्मारकामधील माहितीफलकावरील अक्षरेही धुसर झाली आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावर शासनाने हुतात्मा स्मारक उभारले असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.पनवेल तालुक्यातील शिरढोण हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्यामुळेच शासनाने त्यांचा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला. मोडकळीस आलेल्या वाड्याचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. नूतनीकरणानंतर वाड्यामध्ये क्रांतिकारकांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी भित्तीचित्रे लावण्यात येणार होती; परंतु दोन वर्षांमध्ये त्याविषयी काहीही कार्यवाही झालेली नाही. वाड्यामध्ये पाहण्यासाठी काहीच नाही. जमीन सारवली जात नाही. जुन्या वस्तू वाड्याच्या वरील भागात धूळ खात पडून आहेत. जयंती व पुण्यतिथीलाच वाडा उघडला जात आहे. वाड्याच्या आवारातील जुनी विहीर मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी जयंतीनिमित्त वाड्याच्या परिसरातील गवत काढून साफसफाई केली असली, तरी पुरातत्त्व विभागाकडून फारशी देखभाल केली जात नाही. वाड्याच्या समोरील बाजूला क्रांतिकारकांचे स्मारक असून, त्यामधील एका खोलीत माहितीपट उलगडून दाखविणारे चित्र व माहितीफलक लावलेले आहेत; परंतु त्यावरील मजकूर अस्पष्ट झाला असून, तो वाचता येत नाही. देशाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याची व स्मारकाची दुरवस्था थांबविण्यासही पुरातत्त्व विभागाला अपयश आले आहे. नूतनीकरण केलेला वाडा अद्याप अधिकृतपणे नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही.मुंबई-गोवा रोडला लागून शिरढोण गाव आहे. गावचा देदीप्यमान इतिहास सर्वांना माहीत व्हावा, यासाठी शासनाने महामार्गाला लागून गावाच्या प्रवेशद्वारावर हुतात्मा स्मारक उभारले आहे. हुतात्मा स्तंभ व येथील इतिहासाची माहिती देणारी टुमदार वास्तू उभारण्यात आली आहे; परंतु या स्मारकाची देखभाल करण्यासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही. आद्यक्रांतिकारकांच्या जयंतीदिवशीही स्मारकाच्या आवारातील गवत काढण्यात आलेले नाही. कचरा साफ करण्यात आलेला नाही. हुतात्मा भवनच्या दरवाजाचे टाळे तुटलेले आहे. खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. आतमध्ये प्रचंड धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जयंतीनिमित्त अनेक नागरिकांनी या स्मारकाला भेट दिली व त्याची दुरवस्था पाहून प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. १८५७च्या बंडानंतर शांत झालेला स्वातंत्र्यलढा वासुदेव बळवंत फडके यांनी पुन्हा सुरू केला. या क्रांतिवीरांच्या जन्मगावातील स्मारकाची दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामस्थांनी जपलाय वारसाशिरढोण गावातील वाड्याचे बाह्यकाम पूर्ण झाले असून आतील काम करण्याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करत आहे. स्मारकाची दैनंदिन देखभाल करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. प्रवेशद्वारावरील हुतात्मा स्मारकाकडेही दुर्लक्ष झाले आहे; परंतु ग्रामस्थांनी मात्र त्यांच्या परीने आद्यक्रांतिवीरांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. जयंतीनिमित्त पूर्ण वाड्याभोवती दीप लावून परिसर उजळला जातो. वाड्याच्या परिसराची साफसफाई केली जात आहे.आद्यक्रांतिवीरांचा जीवनपट पुढीलप्रमाणे...- ४ नोव्हेंबर १८४५मध्ये शिरढोण, पनवेल येथे जन्म- १८५० ते ६० दरम्यान कल्याण, पुणे व मुंबई येथे शिक्षण- शिक्षण अर्धवट सोडून रेल्वेमध्ये जीआयपी म्हणून नोकरी- रेल्वेतील नोकरी सुटल्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये क्लार्कची नोकरी- १८६३ मध्ये लष्कराच्या हिशेब खात्यात झाले भरती- २१ फेब्रुवारी १८७९मध्ये इंग्रजांविरोधात बंडाची घोषणा- २२ ते २७ फेब्रुवारी १८७९ला लोणी व खेडवर सावकारांच्या घरावर दरोडा- ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकून बंदुका व रोख रक्कम केली हस्तगत- रामोशी, धनगर, कोळी व इतर समाजातील तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देऊन उभारले लष्कर- इंग्रजांविरोधात युद्ध पुकारून खेड, शिरूरमध्ये लुटले सरकारी खजिने- पुणे शहरावर हल्ला करून काही दिवस पुणे शहरावर मिळविला ताबा- २० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदुगी गावाजवळ इंग्रजांनी पकडले- सार्वजनिक काकांनी त्यांचे स्वीकारले वकीलपत्र- इंग्रजांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावून अरेबियातील एडन येथे टाकले तुरुंगात- १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडन येथील तुरुंगामध्ये मृत्यूस्मारकांची सद्यस्थिती- प्रवेशद्वारावरील हुतात्मा स्मारकाची प्रचंड दुरवस्था- हुतात्मा स्मारकाच्या वास्तूचे खंडरात रूपांतर, धुळीचे साम्राज्य- हुतात्मा स्मारक परिसराची साफसफाई करण्यासाठी यंत्रणाच नाही.

टॅग्स :Raigadरायगड