शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित, पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:36 IST

पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते.

पनवेल  - पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते. सद्यस्थितीला अनेक सोसायट्या विहिरींचे पाणी वापरतात, तर काही ठिकाणी विहिरींमध्ये कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात. विहिरींचे संवर्धन केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील विहिरी संवर्धनासाठी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील शिल्लक असलेल्या विहिरींचे जतन व्हावे, अशी मागणी शेकापचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केली आहे.पनवेलमध्ये पूर्वी वाडा संस्कृती होती आणि या वाड्यात विहिरी होत्या. कालांतराने वाड्यांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या असून विहिरी बंदिस्त करून तेथील पाणी वापरण्यात येत असल्याचे आढळत आहे. काही विहिरी नामशेषसुद्धा झाल्या आहेत तर काही विहिरी मनपाच्या हद्दीत असून त्या दुर्लक्षित असल्याने अस्वच्छ झाल्या आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या विहिरींची डागडुजी करून जलशुद्धीकरण करण्याची गरज आहे. तसेच मैदाने, बगिचे, पालिका कार्यालय आणि शाळेत बोअरवेल मारण्याची मागणी करण्यात आली आहे. लोखंडी पाड्यातील विहीर, दांडेकर वाड्यासमोरील रस्त्यालगतची विहीर अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरातील विहिरी संदर्भात महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाढत आहे. बदलते हवामान व वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्जन्यमान घटत चालले आहे. सर्वांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरालाही काही वर्षांपासून पाणीटंचाईची झळ बसत आहे. उन्हाळ्यापूर्वीच खासगी टँकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागतो. पाणीटंचाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत खेळाचे मैदान, बगिचे, पालिका कार्यालय, आणि शाळेत पाणीपुरवठा करणे मुश्कील होत आहे. याबाबत पालिकेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पालिका क्षेत्रात सुमारे १८२ विहिरी आणि सुमारे १७०० बोअरवेल आहेत. यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पालिका क्षेत्रातील खेळाचे मैदान, बगिचे, विरंगुळा केंद्र, पालिका कार्यालय, आणि शाळेत नव्याने बोअरवेल मारण्यात याव्यात तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विहिरी आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई