शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित, पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:36 IST

पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते.

पनवेल  - पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते. सद्यस्थितीला अनेक सोसायट्या विहिरींचे पाणी वापरतात, तर काही ठिकाणी विहिरींमध्ये कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात. विहिरींचे संवर्धन केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील विहिरी संवर्धनासाठी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील शिल्लक असलेल्या विहिरींचे जतन व्हावे, अशी मागणी शेकापचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केली आहे.पनवेलमध्ये पूर्वी वाडा संस्कृती होती आणि या वाड्यात विहिरी होत्या. कालांतराने वाड्यांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या असून विहिरी बंदिस्त करून तेथील पाणी वापरण्यात येत असल्याचे आढळत आहे. काही विहिरी नामशेषसुद्धा झाल्या आहेत तर काही विहिरी मनपाच्या हद्दीत असून त्या दुर्लक्षित असल्याने अस्वच्छ झाल्या आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या विहिरींची डागडुजी करून जलशुद्धीकरण करण्याची गरज आहे. तसेच मैदाने, बगिचे, पालिका कार्यालय आणि शाळेत बोअरवेल मारण्याची मागणी करण्यात आली आहे. लोखंडी पाड्यातील विहीर, दांडेकर वाड्यासमोरील रस्त्यालगतची विहीर अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरातील विहिरी संदर्भात महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाढत आहे. बदलते हवामान व वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्जन्यमान घटत चालले आहे. सर्वांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरालाही काही वर्षांपासून पाणीटंचाईची झळ बसत आहे. उन्हाळ्यापूर्वीच खासगी टँकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागतो. पाणीटंचाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत खेळाचे मैदान, बगिचे, पालिका कार्यालय, आणि शाळेत पाणीपुरवठा करणे मुश्कील होत आहे. याबाबत पालिकेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पालिका क्षेत्रात सुमारे १८२ विहिरी आणि सुमारे १७०० बोअरवेल आहेत. यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पालिका क्षेत्रातील खेळाचे मैदान, बगिचे, विरंगुळा केंद्र, पालिका कार्यालय, आणि शाळेत नव्याने बोअरवेल मारण्यात याव्यात तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विहिरी आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई