शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित, पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:36 IST

पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते.

पनवेल  - पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते. सद्यस्थितीला अनेक सोसायट्या विहिरींचे पाणी वापरतात, तर काही ठिकाणी विहिरींमध्ये कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात. विहिरींचे संवर्धन केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील विहिरी संवर्धनासाठी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील शिल्लक असलेल्या विहिरींचे जतन व्हावे, अशी मागणी शेकापचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केली आहे.पनवेलमध्ये पूर्वी वाडा संस्कृती होती आणि या वाड्यात विहिरी होत्या. कालांतराने वाड्यांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या असून विहिरी बंदिस्त करून तेथील पाणी वापरण्यात येत असल्याचे आढळत आहे. काही विहिरी नामशेषसुद्धा झाल्या आहेत तर काही विहिरी मनपाच्या हद्दीत असून त्या दुर्लक्षित असल्याने अस्वच्छ झाल्या आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या विहिरींची डागडुजी करून जलशुद्धीकरण करण्याची गरज आहे. तसेच मैदाने, बगिचे, पालिका कार्यालय आणि शाळेत बोअरवेल मारण्याची मागणी करण्यात आली आहे. लोखंडी पाड्यातील विहीर, दांडेकर वाड्यासमोरील रस्त्यालगतची विहीर अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरातील विहिरी संदर्भात महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाढत आहे. बदलते हवामान व वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्जन्यमान घटत चालले आहे. सर्वांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरालाही काही वर्षांपासून पाणीटंचाईची झळ बसत आहे. उन्हाळ्यापूर्वीच खासगी टँकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागतो. पाणीटंचाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत खेळाचे मैदान, बगिचे, पालिका कार्यालय, आणि शाळेत पाणीपुरवठा करणे मुश्कील होत आहे. याबाबत पालिकेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पालिका क्षेत्रात सुमारे १८२ विहिरी आणि सुमारे १७०० बोअरवेल आहेत. यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पालिका क्षेत्रातील खेळाचे मैदान, बगिचे, विरंगुळा केंद्र, पालिका कार्यालय, आणि शाळेत नव्याने बोअरवेल मारण्यात याव्यात तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विहिरी आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई