शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रेल्वे स्टेशनसह शहरातील सुरक्षेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:23 IST

बंकर झाले उद्ध्वस्त : बंदोबस्तावरील पोलीस मोबाइलमध्ये व्यस्त

नवी मुंबई : मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यानंतर शासनाने रेल्वे स्टेशनसह सर्व शहरांमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. हल्ल्याला दहा वर्षे झाल्यानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे स्टेशनमधील बंकर उद्ध्वस्त झाले आहेत. सुरक्षेसाठी तैनात केलेले काही पोलीस कर्मचारी बंदूक बाजूला ठेवून मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

२६/११ च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शहरातील सर्व प्रमुख चौक, महामार्ग, शासकीय कार्यालये व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शस्त्रधारी जवान तैनात केले होते. साध्या वेशातून पोलीसही तैनात केले आहेत. वास्तविक दहा वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतरच रेल्वे स्टेशनसह शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बंकर तयार केले होते. परंतु देखभाल करण्यासाठी यंत्रणाच नसल्यामुळे बंकरचे कचरा कुंडीत रूपांतर झाले आहे. तंबाखू व गुटखा खाणारे प्रवासी बंकरमध्ये थुंकत आहेत. यामुळे आणीबाणीच्या स्थितीमध्ये त्यांचा वापर करणे शक्य होणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर कॅमेरे बसविले आहेत. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी फेरीवाले थेट रेल्वे स्थानकामध्ये व्यवसाय करत आहेत. परंतु कोणावरही कडक कारवाई होत नाही.

शासकीय कार्यालयांमध्ये ये - जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात नाही. कुठेही बेवारस पडलेल्या वस्तूंकडे एक ते दोन तास झाल्यानंतरही कोणीही लक्ष देत नाही. तिकीट खिडकी व इतर ठिकाणी पडलेल्या बेवारस वस्तूंकडेही नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. सोमवारी शहरामध्ये बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांकडे बंदुका देण्यात आल्या होत्या. परंतु अनेक ठिकाणी हे कर्मचारी बंदुका बाजूला ठेवून मोबाइलवरून गप्पा मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPoliceपोलिस