शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पदपथाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:44 IST

जीवाला धोका : वृक्ष कोसळल्याने तुटला पदपथ

नवी मुंबई : सीबीडी येथील खचलेला पदपथ दोन महिन्यांपासून तसाच असल्याने पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या मुख्य चौकालगतच हा प्रकार घडलेला असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याने चालावे लागत आहे. अशातच त्याठिकाणी डागडुजीअभावी उर्वरित रस्तादेखील खचत चालल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

सीबीडी सेक्टर ६ येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही दुर्घटना घडली आहे. रस्त्यालगतच्या वर्षा अपार्टमेंटमधील सुमारे ५० वर्षांपूर्वीचे जुने झाड पावसामुळे कोसळले. हे झाड सोसायटीची भिंत तोडून लगतच्या पदपथावर कोसळले. यामध्ये नाल्यावरील पदपथ तुटून नाला उघडा झाला आहे. या दुर्घटनेनंतर त्याठिकाणच्या पदपथाची तत्काळ दुरुस्ती करून नाला बंदिस्त करण्याची गरज होती. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनदेखील प्रशासनाकडून नाला दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी, लगतच्या वर्षा अपार्टमेंटमधील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी एखादा पादचारी त्याठिकाणी नाल्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीडी पुलाखालील मुख्य चौकात अनेकदा वाहतूककोंडी होत असते.यावेळी गर्दीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात पुढे जाणाºया एखाद्या दुचाकीस्वाराचा देखील त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे; परंतु दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासन यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करूनदेखील तुटलेले पदपथ वेळीच दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप रहिवासी श्रीकृष्ण गावडे यांनी व्यक्त केला आहे. तर भविष्यात त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असाही आरोप त्यांनी केला आहे.

पदपथ तुटून नाला उघड्यावर आल्याने दूषित पाण्याची दुर्गंधी व त्यामधील डासांचा सोसायटीमधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याचाही धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासन गांभीर्य घेत नसल्याच्या कारणांचेही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी