शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

डाळ काही शिजेना, २५ लाख टन आयातीची नामुष्की ओढवणार; मागणीच्या तुलनेत कमी उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 06:53 IST

तूरडाळ किलोमागे २०० रुपयांवर जाण्याची भीती

- नामदेव मोरेनवी मुंबई : कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतात मागणीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन खूपच कमी होते. यंदा पावसाअभावी डाळींच्या लागवडीत आणखी घट होण्याची चिन्हे असून, २५ लाख टन डाळ आयात करावी लागण्याची नामुष्की ओढवणार आहे. समस्त देशवासीयांच्या दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेली तूरडाळ त्यामुळे अधिक भाव खाणार असून, किलोला २०० रुपये एवढी महाग होण्याची शक्यता आहे.

चार वर्षांपासून दरवर्षी साधारण २५ लाख टन डाळींची आयात करावी लागते. गेल्यावर्षी २५ लाख २९ हजार टन डाळ आयात करावी लागली. त्यावर १५ हजार ९८५ कोटी रुपये खर्च झाला. प्रतिदिन सरासरी ७ हजार टन डाळ आयात करावी लागते. मूग, काबुली चणा, वाटाण्याच्या निर्यातीवर बंदी असल्यामुळेही बाजारभाव नियंत्रणात अडथळे येऊ लागले आहेत.

मूग, चणा आणि वाटाण्यावरील निर्बंध हटविण्याची मागणीतूरडाळीच्या आयातीवर कोणतेच निर्बंध नाहीत; पण मूग, चणा व वाटाण्याची आयात बंद आहे. तूरडाळीचे जगात पुरेसे उत्पादन नसल्यामुळे आयातीतही अडथळे येतात. मूग, चणा व वाटाण्याची आयात निर्बंधमुक्त केली तर त्याची आयात वाढून इतर डाळी, कडधान्याचे दरही नियंत्रणात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तूरडाळीचा देशात तुटवडा आहे. जगभर उत्पादन कमी असल्यामुळे पुरेशी आयात होत नाही. शासनाने चणा, वाटाणा व मूग आयात करण्यासाठी सर्वांना परवानगी दिली तर इतर वस्तूंचे दरही नियंत्रणात येतील.- देवेंद्र वोरा, व्यापारी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

या देशांमधून कडधान्याची आयातटांझानिया, मोझांबिक, म्यानमार, सुदान, युगांडा, कॅनडा, युक्रेन, रशिया, तुर्कस्थान, ऑस्ट्रिया, केनिया, ब्राझील व इतर.

 

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई