शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

डीपीवर १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर आयुक्त कार्यालयात घुसू! गणेश नाईकांचा सज्जड इशारा

By नारायण जाधव | Updated: September 12, 2023 19:11 IST

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला.

नवी मुंबई : गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून महापालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने प्रशासनातील अधिकारी सोकावले आहेत. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहराचा डीपी अर्थात विकास आराखडा तयार करायला महापालिकेला उशीर झाला आहे. आरक्षित भूखंडावरून सिडको आणि महापालिकेत वाद आहेत. ते सोडवून येत्या १५ दिवसांत आयुक्तांनी सिडकोशी चर्चा करून मंत्रालयातून डीपीला मान्यता मिळवून आणावी. तसे झाले नाही तर शहरातील नागरिकांना घेऊन आपण आयुक्त कार्यालयात घुसू, असा संतप्त इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी वाशी येथे दिला.

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला. यात शहरवासीयांच्या नागरी समस्यांवर चर्चा करून त्या साेडविण्यावर भर दिला. त्यावेळी आरक्षित भूखंडांची सिडकोने चालविलेली विक्री, रस्त्यांचे चुकीचे नियोजन, महापालिकेच्या डीपीला अद्याप न मिळालेली मंजुरी या विषयांवर जनतेच्या भावना लक्षात घेऊन नाईक यांनी वरील शब्दांत आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा इशारा दिल्यावर उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर महापालिका, सिडको, महावितरण, एमआयडीसीचे अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. जनतेने विचारलेल्या प्रश्नांवर ते प्रशासनाची बाजू मांडत होते. कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक सभागृहात उपस्थित होते.या जन संवाद कार्यक्रमात कोपरखैरणे-घणसोली रस्त्याचे फसलेले नियोजन, आरक्षित भूखंडाची होणारी विक्री, त्यामुळे सार्वजनिक सुविधांअभावी होणारे जनतेचे हाल याबाबत माजी लोकप्रतिनिधींसह उपस्थित जनतेच्या भावना तीव्र होत्या.

सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दोष न देता नाईक यांनी सिडको, एमआयडीसी व महापालिकेेचे अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात अनेकदा जातात. आपली कामे करतात. मग, त्यांना जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डीपीबाबत वेळ का मिळत नाही? तो मंजूर व्हावा असे का वाटत नाही? आमच्या भावना महापालिका आयुक्तांना कळवा. नाहीतर, त्यांच्या दालनात घुसून हा विषय तडीस न्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणता अधिकारी काय करतो, कोणाचा नातेवाईक काय करतो, कोणती कामे घेतो हे लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेला माहीत आहे. त्यांनी आपला कारभार सुधारला नाही, तर मी स्वत: आयटी आणि ईडीकडे तक्रार करेन, असा इशाराही यावेळी गणेश नाईक यांनी दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक