शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

डीपीवर १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर आयुक्त कार्यालयात घुसू! गणेश नाईकांचा सज्जड इशारा

By नारायण जाधव | Updated: September 12, 2023 19:11 IST

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला.

नवी मुंबई : गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून महापालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने प्रशासनातील अधिकारी सोकावले आहेत. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहराचा डीपी अर्थात विकास आराखडा तयार करायला महापालिकेला उशीर झाला आहे. आरक्षित भूखंडावरून सिडको आणि महापालिकेत वाद आहेत. ते सोडवून येत्या १५ दिवसांत आयुक्तांनी सिडकोशी चर्चा करून मंत्रालयातून डीपीला मान्यता मिळवून आणावी. तसे झाले नाही तर शहरातील नागरिकांना घेऊन आपण आयुक्त कार्यालयात घुसू, असा संतप्त इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी वाशी येथे दिला.

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला. यात शहरवासीयांच्या नागरी समस्यांवर चर्चा करून त्या साेडविण्यावर भर दिला. त्यावेळी आरक्षित भूखंडांची सिडकोने चालविलेली विक्री, रस्त्यांचे चुकीचे नियोजन, महापालिकेच्या डीपीला अद्याप न मिळालेली मंजुरी या विषयांवर जनतेच्या भावना लक्षात घेऊन नाईक यांनी वरील शब्दांत आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा इशारा दिल्यावर उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर महापालिका, सिडको, महावितरण, एमआयडीसीचे अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. जनतेने विचारलेल्या प्रश्नांवर ते प्रशासनाची बाजू मांडत होते. कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक सभागृहात उपस्थित होते.या जन संवाद कार्यक्रमात कोपरखैरणे-घणसोली रस्त्याचे फसलेले नियोजन, आरक्षित भूखंडाची होणारी विक्री, त्यामुळे सार्वजनिक सुविधांअभावी होणारे जनतेचे हाल याबाबत माजी लोकप्रतिनिधींसह उपस्थित जनतेच्या भावना तीव्र होत्या.

सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दोष न देता नाईक यांनी सिडको, एमआयडीसी व महापालिकेेचे अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात अनेकदा जातात. आपली कामे करतात. मग, त्यांना जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डीपीबाबत वेळ का मिळत नाही? तो मंजूर व्हावा असे का वाटत नाही? आमच्या भावना महापालिका आयुक्तांना कळवा. नाहीतर, त्यांच्या दालनात घुसून हा विषय तडीस न्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणता अधिकारी काय करतो, कोणाचा नातेवाईक काय करतो, कोणती कामे घेतो हे लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेला माहीत आहे. त्यांनी आपला कारभार सुधारला नाही, तर मी स्वत: आयटी आणि ईडीकडे तक्रार करेन, असा इशाराही यावेळी गणेश नाईक यांनी दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक