शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डीपीवर १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर आयुक्त कार्यालयात घुसू! गणेश नाईकांचा सज्जड इशारा

By नारायण जाधव | Updated: September 12, 2023 19:11 IST

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला.

नवी मुंबई : गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून महापालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने प्रशासनातील अधिकारी सोकावले आहेत. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहराचा डीपी अर्थात विकास आराखडा तयार करायला महापालिकेला उशीर झाला आहे. आरक्षित भूखंडावरून सिडको आणि महापालिकेत वाद आहेत. ते सोडवून येत्या १५ दिवसांत आयुक्तांनी सिडकोशी चर्चा करून मंत्रालयातून डीपीला मान्यता मिळवून आणावी. तसे झाले नाही तर शहरातील नागरिकांना घेऊन आपण आयुक्त कार्यालयात घुसू, असा संतप्त इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी वाशी येथे दिला.

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला. यात शहरवासीयांच्या नागरी समस्यांवर चर्चा करून त्या साेडविण्यावर भर दिला. त्यावेळी आरक्षित भूखंडांची सिडकोने चालविलेली विक्री, रस्त्यांचे चुकीचे नियोजन, महापालिकेच्या डीपीला अद्याप न मिळालेली मंजुरी या विषयांवर जनतेच्या भावना लक्षात घेऊन नाईक यांनी वरील शब्दांत आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा इशारा दिल्यावर उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर महापालिका, सिडको, महावितरण, एमआयडीसीचे अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. जनतेने विचारलेल्या प्रश्नांवर ते प्रशासनाची बाजू मांडत होते. कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक सभागृहात उपस्थित होते.या जन संवाद कार्यक्रमात कोपरखैरणे-घणसोली रस्त्याचे फसलेले नियोजन, आरक्षित भूखंडाची होणारी विक्री, त्यामुळे सार्वजनिक सुविधांअभावी होणारे जनतेचे हाल याबाबत माजी लोकप्रतिनिधींसह उपस्थित जनतेच्या भावना तीव्र होत्या.

सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दोष न देता नाईक यांनी सिडको, एमआयडीसी व महापालिकेेचे अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात अनेकदा जातात. आपली कामे करतात. मग, त्यांना जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डीपीबाबत वेळ का मिळत नाही? तो मंजूर व्हावा असे का वाटत नाही? आमच्या भावना महापालिका आयुक्तांना कळवा. नाहीतर, त्यांच्या दालनात घुसून हा विषय तडीस न्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणता अधिकारी काय करतो, कोणाचा नातेवाईक काय करतो, कोणती कामे घेतो हे लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेला माहीत आहे. त्यांनी आपला कारभार सुधारला नाही, तर मी स्वत: आयटी आणि ईडीकडे तक्रार करेन, असा इशाराही यावेळी गणेश नाईक यांनी दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक