शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:41 IST

health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई - कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे मनपाच्या रुग्णालयातील रुग्णसंख्याही १,५०० वरून ५०० वर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. घराबाहेर वावरताना मास्कच वापर केला जात आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, हात वारंवार धुतले जात आहेत. पालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे व पानटपऱ्यांवर बंधने घातल्यामुळे थुंकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आहारामध्येही बदल झाल असून, या सर्व उपाययोजनांचा परिणाम आरोग्य सुधारण्यासाठी होऊ लागला आहे. कोरोनापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला व इतर किरकोळ आजार झालेले रुग्ण उपचारासाठी रांगेत थांबलेले चित्र पाहावयास मिळत होते, परंतु सद्यस्थितीमध्ये ही संख्या रोडावली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पूर्वी १,२०० ते १,५०० रुग्ण प्रतिदिन उपचारासाठी येत होते. आता ही संख्या ५०० वर आली आहे. इतर रुग्णालयातही हीच स्थिती आहे.  

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळामास्कचा वापर व स्वच्छता यामुळे अतिसार, डांग्या खोकला व इतर आजारांना आळा घातला आहे. विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने ताप व इतर अजारही थांबल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोना काळात लागलेली स्वच्छतेची सवय व आरोग्याविषयी जागरुकता नागरिकांनी कायम ठेवावी असे आवाहन ही डाॅक्टरांनी केले आहे. 

विषाणूजन्य आजारदरवर्षी साथीचे आजार कमी करण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागते. धुरीकरण, औषध फवारणी करावी लागते.  आता पालिकेबरोबच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने फवारणी करू लागले आहेत.  या सर्व उपाययोजनांमुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला असून यावर्षी डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. 

 नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढू लागली आहे. मास्कचा वापर, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लोकांच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झाले असून त्यामुळे सर्वच प्रकारच्या ओपीडीमधील संख्या  कमी झाली आहे.- डॉ. प्रशांत जवादे , आरोग्य अधिकारी, महानगरपालिका 

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई