शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:41 IST

health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई - कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे मनपाच्या रुग्णालयातील रुग्णसंख्याही १,५०० वरून ५०० वर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. घराबाहेर वावरताना मास्कच वापर केला जात आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, हात वारंवार धुतले जात आहेत. पालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे व पानटपऱ्यांवर बंधने घातल्यामुळे थुंकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आहारामध्येही बदल झाल असून, या सर्व उपाययोजनांचा परिणाम आरोग्य सुधारण्यासाठी होऊ लागला आहे. कोरोनापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला व इतर किरकोळ आजार झालेले रुग्ण उपचारासाठी रांगेत थांबलेले चित्र पाहावयास मिळत होते, परंतु सद्यस्थितीमध्ये ही संख्या रोडावली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पूर्वी १,२०० ते १,५०० रुग्ण प्रतिदिन उपचारासाठी येत होते. आता ही संख्या ५०० वर आली आहे. इतर रुग्णालयातही हीच स्थिती आहे.  

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळामास्कचा वापर व स्वच्छता यामुळे अतिसार, डांग्या खोकला व इतर आजारांना आळा घातला आहे. विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने ताप व इतर अजारही थांबल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोना काळात लागलेली स्वच्छतेची सवय व आरोग्याविषयी जागरुकता नागरिकांनी कायम ठेवावी असे आवाहन ही डाॅक्टरांनी केले आहे. 

विषाणूजन्य आजारदरवर्षी साथीचे आजार कमी करण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागते. धुरीकरण, औषध फवारणी करावी लागते.  आता पालिकेबरोबच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने फवारणी करू लागले आहेत.  या सर्व उपाययोजनांमुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला असून यावर्षी डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. 

 नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढू लागली आहे. मास्कचा वापर, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लोकांच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झाले असून त्यामुळे सर्वच प्रकारच्या ओपीडीमधील संख्या  कमी झाली आहे.- डॉ. प्रशांत जवादे , आरोग्य अधिकारी, महानगरपालिका 

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई