शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:41 IST

health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई - कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे मनपाच्या रुग्णालयातील रुग्णसंख्याही १,५०० वरून ५०० वर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. घराबाहेर वावरताना मास्कच वापर केला जात आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, हात वारंवार धुतले जात आहेत. पालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे व पानटपऱ्यांवर बंधने घातल्यामुळे थुंकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आहारामध्येही बदल झाल असून, या सर्व उपाययोजनांचा परिणाम आरोग्य सुधारण्यासाठी होऊ लागला आहे. कोरोनापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला व इतर किरकोळ आजार झालेले रुग्ण उपचारासाठी रांगेत थांबलेले चित्र पाहावयास मिळत होते, परंतु सद्यस्थितीमध्ये ही संख्या रोडावली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पूर्वी १,२०० ते १,५०० रुग्ण प्रतिदिन उपचारासाठी येत होते. आता ही संख्या ५०० वर आली आहे. इतर रुग्णालयातही हीच स्थिती आहे.  

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळामास्कचा वापर व स्वच्छता यामुळे अतिसार, डांग्या खोकला व इतर आजारांना आळा घातला आहे. विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने ताप व इतर अजारही थांबल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोना काळात लागलेली स्वच्छतेची सवय व आरोग्याविषयी जागरुकता नागरिकांनी कायम ठेवावी असे आवाहन ही डाॅक्टरांनी केले आहे. 

विषाणूजन्य आजारदरवर्षी साथीचे आजार कमी करण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागते. धुरीकरण, औषध फवारणी करावी लागते.  आता पालिकेबरोबच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने फवारणी करू लागले आहेत.  या सर्व उपाययोजनांमुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला असून यावर्षी डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. 

 नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढू लागली आहे. मास्कचा वापर, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लोकांच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झाले असून त्यामुळे सर्वच प्रकारच्या ओपीडीमधील संख्या  कमी झाली आहे.- डॉ. प्रशांत जवादे , आरोग्य अधिकारी, महानगरपालिका 

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई