शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उरण-पनवेल परिसरातील शेकडो दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 19:00 IST

प्लांटवर बंदी उठली : प्लांटची धडधड वाढल्याने हवेतील प्रदुषणाचा स्तरही तिपटीने वाढला

मधुकर ठाकूर

उरण : शिवडी- न्हावा सेतूच्या (अटल सेतू ) उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मागील दहा दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट सोमवारपासून (१५) सुरू करण्यात आले आहेत.यामुळे क्रशर-दगडखाण आणि बांधकाम व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.मात्र क्रशर-दगडखाणी पुन्हा धूर ओकू लागल्याने परिसरातील हवेतील प्रदुषणाचा स्तर लागलीच वाढला आहे . अटल सेतूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने उरण-पनवेल-बेलापुर दरम्यान रस्ते, राष्ट्रीय महामार्गावरील जासई, गव्हाण, बंबावीपाडा, कुंडेवहाळ,ओवळे ग्रामपंचायत, सिडकोच्या हद्दीत  सुरू असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट ६ ते १३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे सक्तीचे आदेश दिले होते.तसेच परिसरात धुळ फैलावत प्रदुषणाला कारणीभूत ठरत असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट यांचा विद्युत पुरवठाच बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.यामुळे मागील दहा  दिवसांपासून शेकडोंच्या संख्येने क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद ठेवण्यात आले होते. मागील दहा दिवसांपासून दररोज परिसरात प्रचंड प्रमाणात प्रदुषण फैलावणाऱ्या क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांटची धडधड थांबल्यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रमाणापेक्षाही कमी झाले होते.

कधी नव्हे तर प्रदुषणाचा आयक्यूए स्तर १०० पर्यंत खाली आला होता.तसेच बंद करण्यात आलेल्या क्रशर- दगडखाणी, डांबरप्लांट, रेडीमिक्स प्लांटमुळे बांधकामासाठी खडी,दगड,ग्रीट आदी साहित्य मिळेनासे झाले होते.परिणामी उरण, पनवेल,नवीमुंबई परिसरातील बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. या सक्तीच्या बंदमुळे मात्र संबंधित व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील दहा दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सोमवारपासून (१५)सुरू पुन्हा एकदा सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक-मालक संस्थेचे अध्यक्ष सुनील भोईर यांनी दिली.

सोमवारपासून क्रशर-दगडखाणींची धडधड पुन्हा सुरू झाली आहे.उरण-पनवेल परिसरातील क्रशर-दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट पुन्हा धूर ओकू लागल्याने परिसरातील प्रदुषणाचा आयक्यूए स्तर लागलीच २५० ते ३०० पर्यंत वाढला आहे.बांधकाम व्यावसायिकांची समस्या मिटली असली तरी मात्र परिसरातील प्रचंड प्रमाणात वाढत्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई