शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मुरुडमधील मच्छीमारांची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:15 IST

वादळी वारा सुरू झाल्याने होड्या किनाऱ्यावर

मुरुड : मागील चार दिवसांपासून मुरुड तालुक्यात पावसाळी वातावरण असल्यामुळे समुद्राला मोठी भरती आलेली आहे, त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या बोटी या स्थिर राहत नाहीत. त्याचबरोबर वाºयाचा वेग वाढल्याने मुरुड तालुक्यातील होड्यांची घरवापसी झाली आहे. अचानक हवामानात बदल झाल्याने ऐन दिवाळीत मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गणपती उत्सवादरम्यान जी स्थती निर्माण झाली होती तीच परिस्थिती दिवाळीत झाल्याने सणासुदीच्या काळात समस्त कोळी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे.

मुरुड तालुक्यात ६५० यांत्रिकी व बिगर यांत्रिकी होड्या असून, वेगाने सुटणार वारा व समुद्रातील पाणी खवळल्यामुळे कोणतीही होडी स्थिर राहत नसल्याने, त्याचप्रमाणे जाळी पाण्यात टाकली असता खवळलेल्या समुद्रामुळे सर्व होड्या आगरदांडा व राजपुरी खाडीत परतल्या आहेत. खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी बर्फ , डिझेल व भोजनासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन निघालेल्या बोटी अचानक हवामान बदलामुळे जेमतेम दोन दिवसांत माघारी यावे लागले.

एका बोटीला सर्व साहित्य खरेदीसाठी किमान ७० हजार रुपयांचा खर्च येत असतो; परंतु बोटी या वेळी लवकर आल्याने हा खर्च कोळी बांधवांना न परवडणारा आहे. आगरदांडा व राजपुरी बंदरात पुन्हा बोटीच बोटी दिसत आहेत. एकाच पावसाळ्यात तीन वेळा मच्छीमारांनापुन्हा किनारा गाठावा लागल्याने मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या सर्व संकटांना तोंड द्यावे लागत असतानाच डिझेल परतावा रक्कमसुद्धा शासनाकडून प्राप्त झालेली नाही.

एकाच पावसाळी हंगामात तीन वेळा हवामानाच्या बदलामुळे मच्छीमारांना किनारा गाठावा लागला आहे. त्यामुळे बोटी ज्या वेळी खोल समुद्रात जात असतात, त्या वेळी सर्व साहित्य घेऊन जात असताना अचानक हवामानाच्या या बदलामुळे लाखो रुपयांचे नुकसान कोळी बांधवांचे झाले आहे. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांपासून कोळी बांधवाना परतावा मिळाला नाही. तरी हा डिझेल परतावा लवकरात लवकर मिळण्यासाठी कोळी बांधवांना शासनाकडून परतावा मिळण्यासाठी मदत करावी, जेणेकरून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समाजाला मदतीचा हात मिळू शकेल.

टॅग्स :fishermanमच्छीमार